शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

सोलापूर जिल्ह्यात करणार ८५ लाख वृक्ष लागवड

By appasaheb.patil | Published: July 03, 2019 6:31 PM

पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते उद्या होणार अभियानाचा शुभारंभ

ठळक मुद्देराज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत अभियान राबवण्यात येणारसोलापूर जिल्ह्यास 85.52 लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्टजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन

सोलापूर : राज्य शासनाच्या वन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानात जिल्ह्यात 85.52 लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. यासाठी सुमारे 80 लाख खड्डे खोदून पूर्ण झाले असून  90.41 लाख रोपांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक पी. एच. बडगे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी राज्य शासनाकडून गेल्या तीन वर्षात 50 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. 2017 मध्ये चार कोटी, 2018 मध्ये 13 कोटी आणि यंदा 33 कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्रम पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उद्या, गुरुवार 4 जुलै 2019 रोजी  सिध्देश्वर वन विहार येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे, असेही श्री. बडगे यांनी सांगितले.

राज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत अभियान राबवण्यात येणार आहे. या कालावधीत सोलापूर जिल्ह्यास 85.52 लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध विभागांना उद्दिष्ट आहे. यापैकी वन विभागास 19.20 लाख, सामाजिक वनीकरण विभागास 12 लाख, ग्रामपंचायतींना 32.94 लाख, कृषी विभागास 2.10 लाख, रेशीम विकास विभागास 8.36 लाख तर ग्रामीण विकास विभागास 7 लाखांच्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका 2.20 लाख रोपे लावणार आहे. रोपे लागवडीसाठी 78.47 लाख खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत. या कामाची शासनाच्या संकेतस्थळावरही नोंद करण्यात आली आहे, असे बडगे यांनी सांगितले.   

वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि रेशीम विकास विभाग उद्दिष्टापेक्षा जास्त रोपे लागवड करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात  उद्दिष्टापेक्षा जास्त रोपांची लागवड होईल, असा विश्वास बडगे यांनी व्यक्त केला .-----------90.41 लाख रोपांची निर्मितीवृक्ष लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून 50.05 लाख तर वनविभागाकडून 40.36 लाख रोपांची तयारी करण्यात आली आहेत. सामाजिक वनीकरण विभाग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीना रोपांचा पूरवठा करणार आहे. इतर विभागांना वन विभागाकडून रोपे पुरवली जाणार आहेत, असे बडगे यांनी सांगितले.-------------जिल्हा परिषदेला सर्वाधिक उद्दिष्ट जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला सात लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभाग 19.20 लाख, सामाजिक वनीकरण विभाग 12 लाख, कृषी  2.10 लाख, रेशीम विकास विभाग 8.36 लाख, तर महानगरपालिका 2.20 लाख रोपे लावणार आहे, असे  बडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरgovernment schemeसरकारी योजनाagricultureशेतीenvironmentपर्यावरण