शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

गाळ अन् वाळूमुळे उजनीच्या साठवण क्षमतेत ४३ टीएमसी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 5:04 PM

चाळीस वर्षे साठला गाळ; गाळ काढल्यास हजारो कोटींचा महसूल

ठळक मुद्दे उजनी धरण पूर्ण संचय पातळीवर असताना २९ हजार एवढे प्रचंड बुडीत क्षेत्र यशवंत सागर जलाशयाच्या पोटात वाळूच्या रूपाने काळे सोने दडलेले यांत्रिक बोटीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा करून लाखोंची कमाई

डी. एस. गायकवाड

टेंभुर्र्णी : राज्यात सर्वाधिक १२३ टीएमसी एवढी प्रचंड पाणी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात गेल्या ४० वर्षांत गाळ साचला आहे. यामुळे उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे ४२ ते ४३ टीएमसी एवढी कमी झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. ही इष्टापत्ती समजून धरणातील गाळ व वाळू काढल्यास शासनास हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो,अशी माहिती पुढे आली आहे. 

सन २०११ साली केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या आदेशानुसार दिल्लीस्थित तेजो विकास इंटरनॅशनल या खासगी संस्थेने डीजीपीएस या विशेष तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार उजनी धरणातील गाळ मिश्रित वाळूचे प्रमाण २७.९४ टक्के एवढे होते. त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता ३२ टीएमसी कमी झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर गेल्या १० वर्षांत पुन्हा धरणात आलेला वाळूमिश्रित गाळ लक्षात घेतला तर धरणाची पाणी साठवण क्षमता ४२ ते ४३ टीएमसीने कमी झालेली असू शकते. 

यापूर्वी राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) सन २००७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार उजनी धरणात १२.७७ टक्के इतका गाळ होता तर सन २०११ साली दिल्लीच्या तेजो विकास इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालानुसार हे प्रमाण १२.७७ वरून २७.९४ पर्यंत गेले होते. म्हणजेच सन २००७ ते २०११ याद्वारे सिंचनाच्या रखडलेल्या योजना पूर्ण होऊ शकतात.

 आपण उजनी धरण शंभर टक्के भरले असे म्हणत असताना धरणात वाढलेल्या गाळामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे ४३ टीएमसीने कमी झाली असल्याचे वास्तवही स्वीकारावे लागणार आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास भविष्यात सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते याचेही भान शासन व पाणी वापर करणाºयांनी ठेवले पाहिजे.

पाणी असतानाही काढता येईल गाळतेजो विकास कंपनीने धरणातील वाळूमिश्रित गाळाचे पृथ्थकरण करून गाळ व वाळू याचे प्रमाण ४०:६० असल्याचा अहवाल शासनास दिला होता. हा ४० टक्के गाळ व ६० टक्के वाळू अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या साह्याने धरणात पाणी असतानाही काढता येऊ शकतो. शासनाने धरणातील गाळ व वाळू काढून विक्री केल्यास हजारो कोटींचा महसूल शासनास मिळू शकतो.धरणातील गाळ काढण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यानुसार उजनी धरणातील गाळ काढण्याची निविदाही कृष्णा खोरे विकास मंडळाने काढली होती, परंतु त्याचे पुढे काहीच झाले नाही.

धोरणात्मक निर्णयाचे काहीच झाले नाही सन २०१७ साली महाराष्ट्र शासनाने उजनी धरणासह राज्यातील इतर काही धरणातील गाळ काढण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.त्यानुसार गाळ काढण्याची निविदाही कृष्णा खोरे विकास महामंडळाने काढली होती परंतु त्याचे पुढे काहीच झाले नाही. त्यातील गाळाचे प्रमाण १५.१७ टक्क्यांनी वाढले होते. गेल्या नऊ-दहा वर्षांत यापेक्षा कमी गाळ धरणात आला असे गृहित धरले तरी धरणातील गाळाची टक्केवारी सुमारे ३६ ते ३७ टक्के इतकी होईल म्हणजेच पाणी साठवण क्षमता ४२ ते ४३ टीएमसीने कमी झालेली असेल.

 वाळूमाफियांची चलती उजनी धरण पूर्ण संचय पातळीवर असताना २९ हजार एवढे प्रचंड बुडीत क्षेत्र असते. याच यशवंत सागर जलाशयाच्या पोटात वाळूच्या रूपाने काळे सोने दडलेले आहे. हे बाहेर काढण्याचा त्रास शासन घेत नसले तरी वाळूमाफिया मात्र यांत्रिक बोटीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा करून लाखोंची कमाई करत आहेत. अधिकाºयांवर राजकीय दबाव टाकून वाळू उपसा चालू ठेवला जातो. यामुळे रात्रंदिवस बेसुमार वाळू उपसा चालू आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपात