शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check: पक्षांतर केलेले नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात; राज्यात भाजपाचे १२ आमदार फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 21:14 IST

भाजपाचे हे आमदार राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील असा दावा करण्यात आला आहे.

मुंबई – राज्यात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे राज्यात सत्तांतर होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात सुरु आहेत. राज्यात भाजपा ऑपरेशन कमळ राबवत असून महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार अशी चर्चा सुरु आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर सरकार पाडून दाखवा असं थेट आव्हानच विरोधकांना दिलं आहे.

अशातच राज्यात भाजपा सरकार आलं नाही म्हणून काही आमदार नाराज असल्याचा दावा केला जात आहे. यात ज्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. ते आमदार पुन्हा स्वगृही परतण्यासाठी उत्सुक आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार येईल अशी शक्यता असल्याने अनेक आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांचा समावेश होता.

सध्या सोशल मीडियात टीव्ही ९ या वृत्तवाहिनीचा हवाला देत भाजपाचे १२ आमदार फुटणार अशाप्रकारे फोटो आणि व्हिडीओ क्लीप व्हायरल होत आहेत. या बातमीत भाजपातील नाराज आमदारांचा गट महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामध्ये जे लोक राष्ट्रवादीसोडून गेले होते ते पुन्हा शरद पवार आणि अजित पवारांची भेट घेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीनेही प्लॅन बी तयार केला आहे, भाजपाचे हे आमदार राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील असा दावा करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता हा फोटो आणि व्हिडीओ टीव्ही ९ चा आहे हे सत्य असलं तरी ही बातमी डिसेंबर महिन्यातील आहे, ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपात यांच्यात बिनसलं, त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला.

राज्यात सत्तांतर होत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्य महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे सत्तेच्या अपेक्षेने ज्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता त्यांची गोची झाली. त्यामुळे ते पुन्हा परततील अशी चर्चाही सत्तासंघर्षाच्या काळात होती. त्यामुळे ही बातमी ८ महिने जुनी आहे. त्याचा आत्ताच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही. परंतु गेल्या काही दिवसात राजस्थानमध्ये सुरु असलेली राजकीय घडामोड पाहता राज्यातही अशाचप्रकारे हालचाली होतील अशी चर्चा सुरु आहे.  

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीSocial Mediaसोशल मीडियाShiv Senaशिवसेना