शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्लेतील कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत

By admin | Updated: September 23, 2014 00:16 IST

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला काँगे्रस- राष्ट्रवादी, शिवसेना -भाजप व अपक्ष अशी लढत झाली होती. यावेळी नारायण राणे व समर्थकांनी आघाडीचा धर्म पाळून केसरकर यांना सहकार्य केले होते.

प्रथमेश गुरव - वेंगुर्ले -सावंतवाडी मतदारसंघातील वेंगुर्ले तालुक्यात काँगे्रस - राष्ट्रवादी, शिवसेना युती तसेच मनसेचेही कार्यकर्ते खेडोपाडी विखुरलेले आहेत. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला काँगे्रस- राष्ट्रवादी, शिवसेना -भाजप व अपक्ष अशी लढत झाली होती. यावेळी नारायण राणे व समर्थकांनी आघाडीचा धर्म पाळून केसरकर यांना सहकार्य केले होते. तसेच दीपक केसरकर यांचाही लोकसंपर्क मोठा असल्याने ते चांगल्या मतांनी विजयी झाले होते. मात्र, सद्यस्थितीत राजकीय गणिते बिघडलेल्या स्थितीत असून, केसरकर शिवसेनावासी झाले असल्याने कार्यकर्त्यांमध्येही संदिग्धता आहे. तसेच अजूनही कोणाला उमेदवारी मिळणार निश्चित नसल्याने जनताही व्दिधा मनस्थितीत आहे. केसरकरांचे या मतदारसंघातील प्राबल्य पाहता वेंगुर्लेमधूनही त्यांना पाठिंबा मिळण्यात आघाडीची आडकाठी होणार आहे. यापूर्वी वेंगुर्र्ले तालुक्याचा समावेश नसताना मागील दोन वेळा शिवसेनेचे शिवराम दळवी काँग्रेस - राष्ट्रवादीअंतर्गत बंडखोरीमुळे निवडून आले होते. २००९ साली राष्ट्रवादीचे प्रवीण भोसले यांनी बंडखोरी केल्यामुळे दळवी हॅट्ट्रिक साधणार, असे मानले जात होते. परंतु मागील दोन वेळा संपूर्ण शिवसेना दळवींच्या मागे होती. त्यातील निम्मे राणेंसह काँगे्रसवासी झाले आणि त्यामुळेच शिवराम दळवी आमदार होऊ शकले नाहीत. राष्ट्रवादीच्या दीपक केसरकर यांना ६३,४३०, शिवसेनेच्या शिवराम दळवी यांना ४५,०१२, तर अपक्ष उमेदवार प्रवीण भोसले यांना १९,३६४ एवढी मते सावंतवाडी मतदारसंघातून पडली होती. त्यावेळी एकंदर वेंगुर्ले तालुक्यात नारायण राणेंचा प्रभाव जास्त होता. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा केसरकर हे उमेदवार म्हणून असून, फक्त यापूर्वी आघाडीतर्फे लढले होते. यावेळी ते शिवसेनेतर्फे लढत असल्याचे संकेत आहेत. राणेंचे कट्टर समर्थक राजन तेली यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आघाडीतर्फे राजन तेली उमेदवार असल्याची चर्चा आहे. राडा प्रकरणानंतर वेंगुर्ले शहरातील जनतेने नगर परिषदेवर राष्ट्रवादीला एकहाती सत्ता दिली होती. परंतु राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादामुळे नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी दोन गट पडले. त्याचा शेवट म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या त्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरवले. राष्ट्रवादीकडे एकहाती सत्ता देऊनही त्यांनी विश्वासघात केल्यामुळे विधानसभा निवडणुकीला येथील जनता पुन्हा राष्ट्रवादीला मतदान करील काय, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला खाते खोलता आले नव्हते. मात्र, नुकत्याच झालेल्या वेंगुर्ले तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत शिवसेनेचा सभापती बसला असून, उपसभापती काँग्रेस-राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे पंचायत समिती मतदारसंघात दोघांचीही ताकद राहिल्याने मतदान विभागण्याची शक्यता आहे. पूर्वीचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी दीपक केसरकर यांच्यासमवेत शिवसेनेच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना युतीबरोबच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपला उमेदवार उभा करणार आहे. एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर विचार प्रणालीच्या हिंदू महासभेनेही आपल्या पक्षाचे पुनर्गठन केले असून, त्यांनीसुध्दा आपला उमेदवार जाहीर केला आहे. एकंदर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, अजूनही येथील जनता कोणत्या पक्षाला आपले मत देईल, हे समजणे कठीणच आहे. वेंगुर्ले तालुक्याच्या समस्याही बरीच वर्षे सुटण्याचे नाव घेत नाहीत. मायनिंगमुळे खराब होणारे रस्ते, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, पर्यटनासाठी पयाभूत सुविधांचा अभाव, एस. टी.ची विस्कळीत सेवा, शहरातील भुयारी गटार योजना, पाणी या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पक्षाच्या उमेदवारांनी वरील समस्यांचा नुसताच विचार करु नये, तर त्यावर काही ठोस उपाययोजना करावी, अशीच मतदारांची अपेक्षा आहे.