शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

..पण 'हे' त्यांच्याच कर्माचे फळ, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 13:53 IST

भाजपची लोकप्रियता ज्याना आवडत नाही. तेच लोक ईडी, सीबीआय वगैरे संस्थांच्या नावाने ओरड घालत आहेत. गेल्या ८ वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली.

सुधीर राणेकणकवली : ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही. भाजपची लोकप्रियता ज्याना आवडत नाही. तेच लोक ईडी, सीबीआय वगैरे संस्थांच्या नावाने ओरड घालत आहेत. गेल्या ८ वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली. ही संपत्ती अवैध होती. ती अवैध मार्गाने मिळवलेली होती. तीच जप्त केली गेली आहे असे स्पष्ट मत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केले.राणे कुटुंबीयांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आज, शुक्रवारी सदिच्छा भेट दिल्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, लोकसभा संयोजक अतुल काळसेकर, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मिश्रा म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ ला केले. त्याचेच फळ त्यांना आता मिळतेय. त्यांनी जे लोकांसोबत केले. ज्या प्रकारे विश्वासघात केला. तसेच त्यांच्यासोबतही घडतेय. त्यांचे नेते, आमदार, खासदार त्यांना सोडून गेलेत. माझी त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण हे त्यांच्याच कर्माचेच फळ आहे.सरकारी यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप नाहीखासदार संजय राऊत किती बोलत होते, आता तर जेल मध्ये आहेत. ईडीने त्यांच्याकडील अवैध मालमत्ता जप्त केली. असेच लोक भाजपविरोधात बोलत आहेत. पण याचा आमच्यावर काहीच परिणाम नाही. आमचे सरकार, आमचा पक्ष  कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप करत नाही. सर्व संस्था स्वतंत्र आहेत.भाजपने नितीशकुमारांना हटवले नाहीमहाराष्ट्रात आणि बिहारमध्ये भाजपबरोबर युती करून निवडणुका लढवल्या गेल्या. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याच बरोबर सरकार बनवण्यात आले. यात भाजपची भूमिका कुठे चुकीची होती? बिहारमध्ये भाजपने नितीशकुमारांना हटवले नाही असेही ते म्हणाले.भाजपसाठी निवडणुका महत्वाच्या नाहीतभारतीय जनता पार्टी कधी निवडणुकीची तयारी करत नाही. आमच्यासाठी निवडणुका महत्वाच्या नाहीत तर लोकांसाठी सुविधा निर्माण करून येणाऱ्या पिढीला एक चांगला देश सोपवणे हा आमचा उद्देश आहे असे म्हणत त्यांनी भाजपचा येत्या काळातील उद्देश स्पष्ट केला.जे.पी.नड्डांच्या वक्तव्याचा विपर्यासजे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. त्यांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याचे वक्तव्य केले नव्हते तर त्यांनी अस सांगितले होते की,जर प्रादेशिक पक्ष जनतेसाठी देशपातळीवरच्या सर्व प्रकारच्या योजना राबिण्यासाठी तयार नसतील आणि सरकारच्या योजना गरजवंतांपर्यंत पोचत नसतील तर निश्चितपणे याचे नुकसान प्रादेशिक पक्षांना होईल. असेही केंद्रीय मंत्री मिश्रा यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHome Ministryगृह मंत्रालयUddhav Thackerayउद्धव ठाकरे