शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

..पण 'हे' त्यांच्याच कर्माचे फळ, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 13:53 IST

भाजपची लोकप्रियता ज्याना आवडत नाही. तेच लोक ईडी, सीबीआय वगैरे संस्थांच्या नावाने ओरड घालत आहेत. गेल्या ८ वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली.

सुधीर राणेकणकवली : ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही. भाजपची लोकप्रियता ज्याना आवडत नाही. तेच लोक ईडी, सीबीआय वगैरे संस्थांच्या नावाने ओरड घालत आहेत. गेल्या ८ वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली. ही संपत्ती अवैध होती. ती अवैध मार्गाने मिळवलेली होती. तीच जप्त केली गेली आहे असे स्पष्ट मत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केले.राणे कुटुंबीयांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आज, शुक्रवारी सदिच्छा भेट दिल्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, लोकसभा संयोजक अतुल काळसेकर, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मिश्रा म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ ला केले. त्याचेच फळ त्यांना आता मिळतेय. त्यांनी जे लोकांसोबत केले. ज्या प्रकारे विश्वासघात केला. तसेच त्यांच्यासोबतही घडतेय. त्यांचे नेते, आमदार, खासदार त्यांना सोडून गेलेत. माझी त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण हे त्यांच्याच कर्माचेच फळ आहे.सरकारी यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप नाहीखासदार संजय राऊत किती बोलत होते, आता तर जेल मध्ये आहेत. ईडीने त्यांच्याकडील अवैध मालमत्ता जप्त केली. असेच लोक भाजपविरोधात बोलत आहेत. पण याचा आमच्यावर काहीच परिणाम नाही. आमचे सरकार, आमचा पक्ष  कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप करत नाही. सर्व संस्था स्वतंत्र आहेत.भाजपने नितीशकुमारांना हटवले नाहीमहाराष्ट्रात आणि बिहारमध्ये भाजपबरोबर युती करून निवडणुका लढवल्या गेल्या. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याच बरोबर सरकार बनवण्यात आले. यात भाजपची भूमिका कुठे चुकीची होती? बिहारमध्ये भाजपने नितीशकुमारांना हटवले नाही असेही ते म्हणाले.भाजपसाठी निवडणुका महत्वाच्या नाहीतभारतीय जनता पार्टी कधी निवडणुकीची तयारी करत नाही. आमच्यासाठी निवडणुका महत्वाच्या नाहीत तर लोकांसाठी सुविधा निर्माण करून येणाऱ्या पिढीला एक चांगला देश सोपवणे हा आमचा उद्देश आहे असे म्हणत त्यांनी भाजपचा येत्या काळातील उद्देश स्पष्ट केला.जे.पी.नड्डांच्या वक्तव्याचा विपर्यासजे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. त्यांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याचे वक्तव्य केले नव्हते तर त्यांनी अस सांगितले होते की,जर प्रादेशिक पक्ष जनतेसाठी देशपातळीवरच्या सर्व प्रकारच्या योजना राबिण्यासाठी तयार नसतील आणि सरकारच्या योजना गरजवंतांपर्यंत पोचत नसतील तर निश्चितपणे याचे नुकसान प्रादेशिक पक्षांना होईल. असेही केंद्रीय मंत्री मिश्रा यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHome Ministryगृह मंत्रालयUddhav Thackerayउद्धव ठाकरे