शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चुरस अचानक नाहीशी झाली अन्....

By admin | Updated: October 19, 2014 22:59 IST

शेवटपर्यंत शिवसैनिकच राहीन : उदय सामंत

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात यावेळी सेना-भाजपत न भुतो न भविष्यती अशी चुरस निर्माण झाली होती. मतदानाच्या आधी दोन दिवसांपर्यंत ही चुरस पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर चुरस असल्याचे केवळ वातावरण राहिले. पडद्यामागे असंख्य घडामोडी झाल्या. भाजपच्या घराचे काही वासे फिरले अन चित्रातील रंग बदलले. त्याचवेळी निवडणूक एकतर्फी होणार असल्याच्या काही रंगीत रेघा निवडणुकीच्या चित्राबाहेर डोकावल्या, अन या मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीत मावळलेल्या ग्रहाचा शिवसेनेत ‘उदय’ झाला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात काय होणार, राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या उदय सामंत यांना राष्ट्रवादीतील नाराजीची, असंतोषाची धग बसणार की, सामंतांना शिवसैनिक स्वीकारणार, त्यांच्या विजयाची हट्ॅट्रिक होणार, असे सवाल केले जात होते. सुरूवातीला सामंत यांना सेना नेत्यांसह कार्यकर्त्यांच्याही नाराजीला सामोरे जावे लागले. मात्र, सामंत व त्यांच्या कुटुंबीयांनी ही नाराजी कुशलतेने दूर करण्यात अखेर यश मिळविले, हेच आजच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले. त्यामुळेच चुरशीचे वातावरण संपुष्टात आले व उदय सामंत यांनी या मतदार संघात एकतर्फी विजय नोंदविला. ज्याप्रमाणे त्यांनी रत्नागिरी मतदारसंघाचा पहिला आमदार मंत्री झाल्याचा इतिहास निर्माण केला. त्याचप्रमाणे रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेचा पहिला आमदार म्हणूनही राजकीय पटलावर नाव कोरले आहे. राष्ट्रवादीने दोन वेळा आमदारकी, दीड वर्ष मंत्रिपद व तिसऱ्यांदा उमेदवारीचा एबी फॉर्म दिलेला असतानाही सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश करून खळबळ उडवून दिली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. रत्नागिरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतही तीव्र नाराजी होती. सामंत यांनी प्रवेश केलेल्या शिवसेनेतही प्रथम असंतोष खदखदू लागला. जिल्हा परिषदेच्या तटावरही बंडाची तुतारी घुमू लागली. या सर्वांच्या नाकदुऱ्या काढणे सोपे नव्हते. त्यामुळे सामंत यांचा हा विजय एकतर्फी दिसत असला तरी सहज सोपा नाही. त्यासाठी त्यांना दर सेकंदागणिक संघर्ष करावा लागला हे विसरून चालणार नाही. राष्ट्रवादीत असताना आमदार व नंतर पालकमंत्री म्हणून केलेली कामे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू होती. परंतु त्यांनी बदललेला पक्ष हा राष्ट्रवादी व सेना कार्यकत्याच्याही पचनी पडला नव्हता. त्यामुळे काहीजणांच्या पोटात मळमळू लागले. त्यावर सामंत यांना ‘बहुमोल’ उपचार करावा लागला. त्यातूनच त्यांचे ‘फॉर्च्युन’ ठळक झाले. त्यांच्या विजयाने सेनेतील अनेक कार्यकर्तेही दिवाळीआधीच उजळून निघाले. १९ आॅक्टोबरला सामंत यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाळ माने (भाजप) यांच्यावर ३९३२७ मताधिक्याने विजय मिळविला. सेनाप्रवेशानंतर प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी निवडणुकीच्या आधी काही काळ स्वत:साठी अनुकूल कशी बनविली, यामागील ‘राज’ मात्र कायम आहे. रत्नागिरी मतदारसंघातील ही निवडणूक मुळातच चौरंगी होती. परंतु राष्ट्रवादीत पडलेली फूट व कॉँग्रेसची अपुरी असलेली ताकद यामुळे सेना-भाजप या आधीच्या मित्रपक्षातच ही दुरंगी लढत रंगली. उदय सामंत यांच्याशी सलग तिसऱ्या वेळी सामना करताना विजय व्हावा व आधीच्या दोन वेळचा पराभव धुवून काढताना पराभवाची हॅट्ट्रिक टाळता यावी, यासाठी भाजपचे उमेदवार बाळ माने यांनी आटोकाट प्रयत्न केले. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच नितीन गडकरी यांच्याही सभा या मतदार संघात घेतल्या. त्यातून एक वातावरण भाजपच्या बाजूने तयार झाले. परंतु हे वातावरण अगरबत्तीच्या धुराप्रमाणे तत्कालिक ठरले. निवडणूक मतदानाच्या आधी निर्माण झालेला हा धूर अगरबत्ती पेटून गेल्यानंतर विरून गेला व अगरबत्तीच्या मुळाशी काड्या तेवढ्या उरल्या, असेच त्याचे वर्णन करावे लागेल. काय झाले, कसे घडले, कोण फितूर झाले, कोणाला लॉटरी लागली, शहरात काही स्वकियांनीच दगा दिला काय, संघाचे कार्यकर्ते माने यांच्या प्रचारासाठी फिरूनही त्याचा उपयोग झाला नाही काय, यांसारख्या मुद्द्यांवरच पराभवानंतरचा खल सुरू झाला आहे. सामंत यांनी अचानकपणे कोणतेही पटणारे कारण नसताना राष्ट्रवादी सोडून सेनेत प्रवेश केल्याने त्यांना गद्दार ही उपाधी भाजपने दिली. रत्नागिरीतील लढाई ही ‘गद्दार विरूध्द निष्ठावंत’ या मुद्द्यावर लढली गेली. मुलूखमैदान तोफ म्हणून राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनीही सामंत यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. सामंत यांना गनिमी काव्याने चितपट करण्याचे सर्व प्रयत्न करूनही भाजपला ही जागा सलग तिसऱ्यांदा गमवावी लागली. त्यामुळे सामंत यांनी अशी कोणती जादू केली की, त्यामुळे भाजपची सर्वच अस्त्र निष्प्रभ ठरली, याचीही चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या संघटन कौशल्यामुळे तालुक्यात ९४ पैकी ६८ ग्रामपंचायतींवर सेनेचे वर्चस्व आहे. त्यातीलही काही बुरुज ढासळविण्यात भाजपला यश आले होते. मात्र, अखेरच्या क्षणी त्या बुुरुजांची ‘मोला’ची डागडुजीही सेनेकडून झाली.रत्नागिरी शहरातून भाजपला मताधिक्य मिळण्याची मोठी अपेक्षा होती. किमान ६ ते ७ हजारांचे मताधिक्य मिळेल, असा दावा शहरातील भाजप नेते करीत होते. परंतु त्यांचे अंदाज चुकले की, अखेरच्या क्षणी फितुरी झाली, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी माने यांच्या या तिसऱ्या पराभवाची कारणमीमांसा करतीलच. परंतु आधीच्या दोन पराभवानंतर केलेल्या कारणमीमांसेचे काय झाले, हा प्रश्नही अनुत्तरीतच आहे. ही निवडणूक स्वतंत्रपणे लढल्यानंतर सर्वच पक्षांना आपण किती पाण्यात आहोत, याची प्रचिती या निमित्ताने आली आहे.शेवटपर्यंत शिवसैनिकच राहीन : उदय सामंतमाझ्याविरोधात कटकारस्थाने करणाऱ्या विरोधकांना मतदारांनी, माझ्या समर्थकांनी मला प्रचंड मतांनी विजयी करून चोख उत्तर दिले आहे. गद्दारीचा मुद्दा पुढे करून मतदारांसमोर जाणाऱ्यांना मतदारांनी स्वीकारले नाही. माझा विजय हा ऐतिहासिक आहे. राजकारणात आहे, तोपर्यंत शिवसैनिक म्हणूनच राहीन. विकासकामे पुन्हा नव्या जोमाने पूर्ण करण्यासाठी कटिबध्द आहे, अशी प्रतिक्रिया सेनेचे विजयी उमेदवार उदय सामंत यांनी दिली. कार्यरत राहणार : मानेंमतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. आपण निश्चितपणे मतदारांसमोर चांगल्या पध्दतीने सामोरे गेलो होतो. पराभवाने आतापर्यंत खचलो नाही, पुढेही खचण्याचे कारण नाही. जनतेची कामे यापुढेही करतच राहणार आहे. विकासकामांना भाजपाच्या माध्यमातून न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रीया दुसऱ्या क्रमांकाचे पराभुत उमेदवार बाळ माने यांनी दिली. सर्वकाही पणाला :मुर्तुझा राष्ट्रवादीचा उमेदवारच ऐनवेळी दुसऱ्या पक्षात गेला. त्यामुळे आम्हाला निवडणूक तयारी करण्यास वेळच मिळाला नाही. तरीही राष्ट्रवादीतून सेनेत गेलेल्या सामंतांना सहज विजय मिळालेला नाही. त्यांना सगळ्या गोष्टी पणाला लावाव्या लागल्या, हे लपून राहिलेले नाही. मतदारांचा कौल मान्य असल्याचे बशीर मुर्तुझा म्हणाले.