शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

टिळक पंचांगाप्रमाणे आजपासून रत्नागिरीत गणेशोत्सव

By admin | Updated: August 18, 2015 00:40 IST

गणरायाचे विसर्जन २४ आॅगस्टला

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी टिळक पंचांगानुसार मंगळवारपासून रत्नागिरीत गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. रत्नागिरीतील हा गणेशोत्सव १३६ वर्षांचा जुना असून, गेल्या सात पिढ्या टिळक पंचांगाप्रमाणेच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. १८ आॅगस्टला प्रतिष्ठापना होत असलेल्या गणरायाचे विसर्जन यंदा पाच दिवसांऐवजी ८ दिवसांनी म्हणजेच २४ आॅगस्टला होणार आहे. याबाबत येथील गणेशभक्त उदय केशव पटवर्धन यांनी ‘लोकमत’ला रत्नागिरीत टिळक पंचांगाप्रमाणे होणाऱ्या गणेशोत्सवाची माहिती दिली. रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील पटवर्धन परिवारांपैकी आठ कुटुंबांच्या घरी स्वतंत्रपणे घरगुती गणपती व संपुर्ण कुटुंबांचा मिळून एक गणपती असे टिळक पंचांगानुसार आणले जातात. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. रत्नागिरी शहरातच टिळक पंचांगाप्रमाणे सुमारे २५ गणपतींचे पूजन केले जाते. त्याशिवाय गणेशगुळे, शिरगाव येथील मनोहर जोशी यांच्या घरीही गणेशपूजन केले जाते. गुहागर तालुक्यात व जिल्ह्याच्या अन्य भागातही टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जातो. गेली १३६ वर्षे या पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा केला जातो. ‘निर्णयसागर’ किंवा अन्य पंचांगानुसार बहुतांश लोक गणेशोत्सव साजरा करतात. परंतु, टिळक पंचांग मानणारेही जिल्ह्यात बऱ्यापैकी आहेत, असे पटवर्धन यांनी सांगितले. आदल्या दिवशी गणेशमूर्ती घरी आणली जाते. मंगळवारी गणेशमूर्ती सकाळी १० वाजता प्रतिष्ठापित केली जाते. खरेतर पाच दिवसांचा हा गणेशोत्सव असतो. पण यावेळी गौरी आगमन व विसर्जनाचे दिवस या पंचांगाप्रमाणे पुढचे आल्याने यंदाचा गणेशोत्सव हा आठ दिवसांचा राहणार आहे. गणेशोत्सवात २२ आॅगस्टला खड्याच्या ५ गौरी आणल्या जाणार आहेत. तर २४ आॅगस्टला गौरी व गणपती यांचे विसर्जन होणार आहे. शहरात मुख्यत्वे पटवर्धन परिवारातील ८ कुटुंबाच्या घरी होणाऱ्या गणेशोत्सवात दर दिवशी सहस्त्रावर्तन, दूधाचा अभिषेक, १२१ मोदकांचा प्रसाद व महापूजा असा कार्यक्रम असतो. मुख्य गणपतीच्या ठिकाणी सहाव्या दिवशी मोठा उत्सव होणार आहे. सहस्त्रावर्तन, टिपऱ्या कार्यक्रम, रात्री महाआरती, त्यानंतर भजन असा कार्यक्रम होतो. यावेळीही हीच परंपरा कायम राखली जाणार आहे. राज्यातील गणेशोत्सव १७ सप्टेंबरला होत आहे. मात्र, त्यापूर्वी महिनाभर आधी टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव १८ आॅगस्टपासून सुरू होत आहे. रत्नागिरी शहरात या गणेशोत्सवाची धूम आहे. मंगळवारी गणरायाचे आगमन होणार असलेल्या घरी आरास व गणेशाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे.