शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

जिल्ह्यातील त्या हत्यांचा तपास करण्यात यावा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 18:39 IST

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना पक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने टाहो फोडणारे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे त्यांचे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या खुनाबद्दल अद्यापही मौन बाळगून का आहेत? असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील त्या हत्यांचा तपास करण्यात यावा, मुख्यमंत्र्यांकडे मागणीविनायक राऊत यांची कुडाळमध्ये माहिती

कुडाळ : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना पक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने टाहो फोडणारे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे त्यांचे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या खुनाबद्दल अद्यापही मौन बाळगून का आहेत? असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २००२ पासून रमेश गोवेकर, अंकुश राणे व रमेश मणचेकर या चार जणांच्या हत्यांचा तपास पुन्हा एकदा सुरू करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली.खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी तालुकाप्रमुख संतोष शिरसाट, युवा सेनाप्रमुख मंदार शिरसाट, माजी उपसभापती श्रेया परब तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, मागील काही दिवसांपासून भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे व त्यांचे पुत्र हे सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी शिवसेना पक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने टाहो फोडत आहेत.खरेतर सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी भूमिका राज्य सरकारची आहे. या प्रकरणी राज्य सरकार उच्च न्यायालयात गेले आहे. असे असतानाही केंद्र सरकारने राज्य सरकारला न विचारता सीबीआय चौकशी लावून सीबीआयचा दुरुपयोग केला, असा आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला.राणे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, राणे यांनी सुशांतसिंह यांच्या मृत्यूप्रकरणी जेवढी तत्परतेने पत्रकार परिषद घेतली आणि जे आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. त्याची सत्यता सर्व चौकशीअंती बाहेरच येईलच. मात्र, त्यांचा सख्खा चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या हत्येबाबत राणे यांनी कधीच एकही शब्द का काढला नाही? याबाबत जिल्ह्यातील जनतेला चांगलेच माहीत आहे.या जिल्ह्यात २००२ पासून झालेले रमेश गोवेकर, अंकुश राणे, रमेश मणचेकर या चारही जणांच्या हत्येचा संपूर्ण तपास पुन्हा सुरू करून या प्रकरणातील आरोपी तसेच यामागचे खरे सूत्रधार यांना अटक करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असल्याचेही राऊत म्हणाले.पुढील पाच वर्षे स्थिर सरकारकर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविल्यानंतर शिवप्रेमींनी याबाबत आंदोलन सुरू केले. त्यामुळे कर्नाटक सरकारने पुन्हा पुतळा बसविण्याचे आश्वासन दिले. मात्र, मराठा समाजाचे नेते म्हणविणारे राणे व आमदार नीतेश राणे हे याबाबत काहीच बोलले नाहीत. कारण कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे आणि जर हे बोलले तर यांना भाजप वाळीत टाकेल हे त्यांना माहीत आहे. म्हणून ते बोलले नाहीत, असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला.या जिल्ह्यात २००२ पासून रमेश गोवेकर, अंकुश राणे, रमेश मणचेकर या चार हत्या झाल्या. यावेळी राणे पालकमंत्री व मंत्री होते. मात्र, या चारही हत्यांचा तपास अजूनही लागला नाही. एकाही आरोपीला अटक केली नाही. याबाबत राणे केव्हाच काही बोलताना दिसले नाहीत. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग