शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

महाआॅनलाईनचा संशयास्पद कारभार

By admin | Updated: November 19, 2014 23:13 IST

कमलताई परुळेकर : दिशाभूल करु नये

सिंधुदुर्गनगरी : महाआॅनलाईनचे विभागीय गटसमन्वयक सुयोग दीक्षित हे वृत्तपत्रांना खोटी माहिती पुरवून दिशाभूल करीत आहेत. त्यांच्याकडून दरमहा मानधन आणि लुबाडणूक केली जात नसेल तर संगणक परिचालकांना आंदोलन करावे का लागले? असा प्रश्न संगणक परिचालक संघटनेच्या नेत्या कमलताई परूळेकर यांनी केला आहे. तर परिचालकांना मिळणाऱ्या ८ हजारपैकी ५० टक्के रक्कम जाते कुठे? ते जाहीर करावे, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकातून केले आहे.राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने संपूर्ण राज्यभर महाआॅनलाईनच्या संशयास्पद कारभाराविरोधात आणि विविध मागण्यांसाठी १२ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३५० संगणक परिचर या आंदोलनात उतरले आहे. गेले दोन दिवस जिल्हा परिषद भवनासमोर त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील संग्राम कक्षाचे काम पूर्णपणे ठप्प झाल्यानंतर महाआॅनलाईनचे कोकण विभागीय समन्वयक सुयोग दीक्षित यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी संगणक परिचालकांना दरमहा नियमित ४१०० मानधन दिले जाते. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी मिळणाऱ्या ८००० रूपयातून मानधनासह छपाई साहित्य, देखभाल दुरूस्ती यासह सर्वच खर्च समाविष्ट असल्याचे सांगितले होते. तसेच कोणत्याही प्रकारे संगणक परिचालकांची पिळवणूक केली जात नसल्याचे स्पष्ट केले होते.याबाबत मंगळवारी कमलताई परूळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सुयोग दीक्षित हे वृत्तपत्रांना खोटी माहिती पुरवून दिशाभूल करीत आहेत. दरमहा मानधन मिळत असेल, अन्याय होत नसेल तर आंदोलने कशासाठी करायची? गेले तीन वर्षे प्रत्येक डाटा आॅपरेटरसाठी मिळणाऱ्या ८००० रूपयांपैकी ५० टक्केहून जादा पैसे कुठे जातात? याचा शोध घेत आहोत. हे पैसे कुठे खर्च केले जातात? या खर्चाचा ताळेबंद त्यांनी द्यावा. काहींना ३५०० तर काहींना ३८०० रूपये मानधन प्रत्यक्ष दिले जात असताना दरमहा ४१०० देतो, असे सांगणे खोटे आहे. तसेच तीन-तीन महिने वेतन दिले जात नसताना दरमहा नियमित मानधन दिले जात असल्याचे खोटे सांगत आहेत. मिळणाऱ्या ८००० रूपयांतून ५० टक्के रक्कम सुमारे ४००० रूपये कशावर खर्च होतात? दरमहा देखभाल दुरूस्तीवर खर्च येत नाही. छपाई साहित्य २०० ते ३०० रूपयांना मिळते, मग एवढे पैसे जातात कुठे? हा आमचा प्रश्न आहे. महाआॅनलाईन कंपनी ५० टक्केपेक्षा जास्त रक्कम कशासाठी खर्च करते हे गेल्या तीन वर्षाचा जमा-खर्चाचा ताळेबंद दीक्षित यांनी जाहीर करावा. तसेच प्रवास खर्च, बैठक भत्ता देण्याचे शासन आदेशात नमूद केले असताना ते पैसे कोण हडप करतो? हे दीक्षित यांनी सांगावे. (प्रतिनिधी)सत्य समोर आणावेच लागेल कोणत्या बाबीवर किती खर्च केला जातो? याचा ताळेबंद जाहीर करावा. केवळ वृत्तपत्रांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रकार करू नये. सत्य समोर आणावेच लागेल, असा इशारा कमलताई परूळेकर यांनी दिला आहे.