शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

सिंधुदुर्ग : राफेल प्रकरणी काँग्रेसकडून दिशाभूल : श्‍वेता शालिनी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 4:01 PM

लोकमत न्यूज नेटवर्क कणकवली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राफेलबाबतची केंद्र सरकारची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र ...

ठळक मुद्देराफेल प्रकरणी काँग्रेसकडून दिशाभूल सिंधुदुर्गात श्‍वेता शालिनी यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राफेलबाबतची केंद्र सरकारची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच देशाचा चौकीदार प्रामाणिक आहे. पण चुकीची माहिती देऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाजपच्या राज्य मीडिया सेलच्या प्रमुख व प्रदेश प्रवक्‍ता श्‍वेता शालिनी यांनी येथे केला.राफेल कराराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही काँग्रेसकडून भाजपवर चिखलफेक सुरू आहे. राफेल व्यवहाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांची बाजू मांडण्यासाठी श्‍वेता शालिनी या मंगळवारी सिंधुदुर्गात आल्या होत्या. त्यांनी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, अतुल रावराणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, प्रभाकर सावंत, संदेश सावंत- पटेल, प्रज्ञा ढवण, गीतांजली कामत आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी श्‍वेता शालिनी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. यूपीएच्या काळात राफेलचा व्यवहार सुरू झाला होता. पण बोफोर्स हा ज्यांचा इतिहास आहे. ती काँग्रेस या व्यवहारात 10 वर्षे दलालांकडून किती दलाली मिळते त्याची वाट पाहत राहिली. त्यांच्यासाठी देशाची सुरक्षितता महत्त्वाची नव्हती. मात्र, आम्ही देशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. त्यामुळेच आमचे सरकार आल्यावर यात कोणताही बदल न करता राफेल खरेदीसाठी पुढाकार घेतला. फक्‍त यातून दलालांना बाजूला करण्यात आले. भारत आणि फ्रान्स सरकारने एकमेकांशी थेट व्यवहार केले. हीच गोष्ट काँग्रेस आणि राहुल गांधी यांना खटकत आहे. म्हणून ते आमच्यावर आरोप करीत आहेत, असे सांगत श्‍वेता शालिनी म्हणाल्या की, न्यायमूर्ती दीपक मिश्रा प्रकारणांमध्ये ज्या न्यायाधीशांची बाजू काँग्रेसने घेतली होती त्याच न्यायाधीशांनी जेव्हा राफेलबाबत केंद्र सरकारला क्लीन चिट दिली तेव्हा राहुल गांधींना तेच न्यायमूर्ती चुकीचे कसे काय वाटू शकतात असा प्रश्‍न त्यांनी यावेळी उपस्थित केला.केंद्र सरकारला देशाची सुरक्षितता महत्वाची वाटते, त्यामुळे राफेल संदर्भात महत्वाच्या गोपनीय गोष्टी खुल्या न करता हा व्यवहार पारदर्शी झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या व्यवहारावर संशय व्यक्त करून काँग्रेस देशवासीयांचा, वायु सेनेचा अपमान करत आहे मात्र देशाची जनता हुशार आहे, ती योग्य निर्णय घेईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.देशात विकासकामे संथ होत आहेत मात्र ती बंद नाहीत. देशाचे शासन बदलले आहे. पण प्रशासन गेली 60 वर्षे तेच आहे .त्याचा हा परिणाम आहे . पण पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सकारात्मक बदल घडवतील आणि 2019 मध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल.असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग