शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

संधी देऊनही राणेंनी विकास केला नाहीप्रमोद जठार :

By admin | Updated: August 17, 2014 22:33 IST

शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ मेळाव्यात टीका

शिरगांव : जनतेने २५ वर्षे संधी देऊनही पालकमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही. आता त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा करायच्या, अशी टीका आमदार प्रमोद जठार यांनी शिरगांव येथील मेळाव्यात केली.शिरगांव आंबेखोल येथे शिरगांव जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा १६ आॅगस्ट रोजी झाला. यावेळी आमदार जठार बोलत होते. ते म्हणाले, कचऱ्याचे साम्राज्य सर्वांनी पाहिले, मात्र साम्राज्याचा झालेला कचरा जिल्हावासियांनी पाहिला आहे. नारायण राणेंवर जनतेने प्रेम केले. २०-२५ वर्षे संधी दिली. विविध मंत्रीपदे, खासदारकी मिळाली, पण विकास करू शकले नाहीत. विकासात ते नापास झालेत. महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीत भगवा फडकणार याची सर्वप्रथम चाहूल नारायण राणेंनाच लागली. याची कबुली त्यांनी आपल्या राजीनामानाट्यात बोलूनही दाखवली, अशी टीका जठार यांनी यावेळी केली. आमदार प्रमोद जठार पुढे म्हणाले, इकोसेन्सिटिव्ह काँग्रेसने लादली. चिरे म्हणजे बॉक्साईट नव्हे, हे पटवून दिले. सत्तेत असताना अधिस्थगन उठवू न शकलेले पालकमंत्री आता पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचे सांगत आहेत. नारायण राणे यांना शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री करुन नराचा नारायण केला. लोकसभेतील निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याने ते सर्वांवर टीका करत आहेत.नेत्याला जनतेचा कळवळा असायला हवा. सत्ता ही रोजी रोटीसाठी नाही. जनतेला सर्व खरं खोट कळते. त्याचेच उत्तर निकालात मिळते, अशीही टीका जठार यांनी यावेळी केली.शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मेळाव्यास जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, पंचायत समिती सदस्य संतोष किंजवडेकर, देवगड तालुकाध्यक्ष सदाशिव ओगले, उपाध्यक्ष राजेंद्र शेटये, सरचिटणीस संजय बांबुळकर, जिल्हा परिषद गटप्रमुख संतोषकुमार फाटक, माजी तालुका सरचिटणीस मंगेश लोके, राजाराम राणे, ग्रामपंचायत सदस्या अपूर्वा तावडे, दिगंबर तावडे, अमोल लोके, सयाजी पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)