शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आधीची भरपाई गारठली

By admin | Updated: June 30, 2015 23:36 IST

पुढचं पाठ, मागचं सपाट : नुकसानग्रस्तांबाबत सापत्न भाव

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाकडे या आर्थिक वर्षासाठी नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून प्राप्त झाली आहे. मात्र, पुढचं पाठ मागचं सपाट, या उक्तीनुसार गेल्या वर्षीच्या नुकसानग्रस्तांचा मात्र विसर पडला आहे. शासनाच्या या उफराट्या न्यायामुळे जनावरांचे नुकसान झालेले शेतकरी तसेच खासगी मालमत्ताधारक नुकसानग्रस्त यांना अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. गेल्या वर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने ८९० घरे व गोठ्यांचे एकूण १००,२४,४८६ रूपयांचे नुकसान केले आहे. ३१ सार्वजनिक मालमत्तांचे ५ लाख २१ हजार ४०० रूपयांचे, तर ४७ खासगीमालमत्तांचे ६ लाख ४१ हजार ७६१ रूपयांचे असे एकूण १ कोटी २१ लाख ३१ हजार ५४७ रूपयांचे नुकसान झाल्याची नोंदप्रशासनाकडे असली तरीही त्याहीपेक्षा जास्त नुकसान जिल्ह्यात झाले आहे. या नुकसानाची भरपाई आतापर्यंत केवळ २९ लाख रूपये इतकेच शासनाकडून देण्या आले आहेत. तसेच या कालावधीत पावसाने बळी घेतलेल्या पाच व्यक्तिंच्या वारसांना प्रत्येकी दीड लाख रूपयांप्रमाणे साडेसात लाख रूपये देण्यात आले आहेत. यात केवळ ८१ घरे व गोठ्यांच्या नुकसानभरपाईचा समावेश आहे. उर्वरित शेतकरी व खासगी मालमत्ताधारकांना अद्याप भरपाईही मिळालेली नाही. यावर्षीसाठी नव्याने निधी आला. मात्र, मागच्या वर्षीच्या नुकसानग्रस्तांचा विसर शासनाला पडलेला दिसतो. जिल्ह्यात या पावसाळ्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंच्या वारसांना ८ लाख रूपयांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात पडझड झालेली घरे व गोठ्यांसाठी १० लाख रूपये देण्यात आले आहेत. यावर्षी मृत जनावरांच्या मालकांना अडीच लाखाचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत २० लाख ५० हजार रूपयांचे वितरण झाले आहे. यावर्षी सुरूवातीला झालेल्या पावसात बळी गेलेल्यांच्या वारसांना, मृत जनावरांच्या मालकांना तसेच पडझड झालेली घरे, गोठ्यांसाठी शासनाकडून निधी आला आहे. मात्र, गतवर्षीच्या नुकसानाबाबत शासन बेदखल आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षेचे बियाणेकोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. या नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना खेटे घालावे लागत आहेत. पुढचं पाठ मागचं सपाट या न्यायाने गत नुकसानग्रस्तांची भरपाई लाल फितीत अडकली आहे. शेतीचे, शेतजनावरांचेही नुकसान सोसावे लागल्यामुळे मागील नुकसानभरपाई कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे.तपशीलसंख्यानुकसानाची रक्कमप्रत्यक्ष मिळालेलीघरे व गोठे८९० १००,२४,४८६२९,००,००० (८१ घरे व गोठ्यांसाठी)व्यक्ती०५७,५०,०००७,५०,०००जनावरे०८१,९४,५००अद्याप नाही सार्वजनिक३१५,२१,४००अद्याप नाही खासगी ४७६,४१,१६१अद्याप नाही