शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

आंबा पिकावर अवकृपा

By admin | Updated: November 16, 2014 00:24 IST

कोकण कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना बागा वाचविण्याचा सल्ला

शिवाजी गोरे / दापोलीकोकणाचे अर्थकारण योग्य दिशेला नेणारे आंबा पीक यावेळी अवकाळी पावसामुळे धोक्यात येण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. आंबा बागायतदारांनी कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार फवारणी करून आपले नुकसान टाळणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी दिला आहे. आंबा बागायतदारांसाठी आॅक्टोबर-नोव्हेंबर हा कालावधी महत्त्वाचा असतो. या कालावधीत आंब्याला पालवी फुटते. याच कालावधीत आंब्यावर चिकटा, करपा, बुरशीसारखे रोग पडतात. नोव्हेंबर महिना मोहोर येण्याचा कालावधी असतो. नोव्हेंबर - डिसेंबर या महिन्यात आंब्याला मोहोर येतो. याच कालावधीत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे आंब्यावर विविध रोग होतात. ढगाळ व दमट वातावरण अळीला अंडी उबवण्यासाठी पोषक असते. ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर करपा, चिकटा पडतो. त्याचवेळी आंब्यावर फवारणी केल्यास होणारा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. आंब्याला मोहोर येण्यापूर्वी कीटकनाशक फवारुन त्यावरील रोग नष्ट करणे गरजेचे आहे. कोकणात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने याचा आंबा पिकावर नक्की परिणाम होऊ शकतो; परंतु योग्यवेळी कीटकनाशके फवारल्यास होणारा धोका टळू शकतो, असाही सल्ला डॉ. भावे यांनी दिला आहे.आंबा बागायतदारांनी औषध फवारणीला प्राधान्य द्यावे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्याने योग्यवेळी फवारणी केल्यास होणारे नुकसान टाळता येईल. कोकणात सव्वा लाख हेक्टरवर आंब्याचे उत्पन्न घेतले जाते. तरीही अजून ग्रामीण भागातील शेतकरी आंबा बागायतीकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत. ठरावीक आंबा बागायतदार शेतकरी योग्य काळजी घेऊन आपले उत्पन्न घेत आहेत. काढणीपश्चात व्यवस्थापनाचीसुद्धा शेतकऱ्याने काळजी घेणे गरजेचे आहे.