शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

CAA: हिंसाचार माजवून राजकारण करणाऱ्यांच्या पाठीमागे विरोधकांचा हात: भंडारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 12:21 PM

घटनात्मक चौकटीत राहून करण्यात आलेल्या कायद्याचे आव्हान देणाऱ्या काँग्रेसला संसदीय कार्यपद्धती, संविधान मान्य नाही, असेच यातून दिसून येत असल्याचे टीकास्त्रदेखील त्यांनी केले.

रत्नागिरी ( देवरुख ) : नागरिकत्व कायद्यावरून एवढा विरोध आणि संघर्ष का सुरू आहे. आपण संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. हा कायदा सरकारने बहुमताने घटनात्मक कार्यपद्धतीच्या चौकटीत राहूनच संमत केलेला आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीला संविधानाशी, घटनात्मक कार्यपद्धतीशी बांधीलकी नसल्याचा आरोप भाजपचे महाराष्ट्र मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी देवरुख येथे केला. 'नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ भ्रम आणि वास्तव' याविषयी व्याख्यान व चर्चासत्रात भंडारी बोलत होते.

यावेळी भंडारी म्हणाले की, सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून विरोधी भूमिका टोकाला पोहोचल्या आहेत. टोकाची विधाने दिल्लीच्या शाहीनबाग यांच्याकडून केली जात आहेत. कायद्याचे समर्थन करणाऱ्यांना देखील हा कायदा म्हणजे काय हे कळालेले नाही, तर विरोधी भूमिका संघर्ष करणाऱ्यांना देखील याची नीटशी माहिती नाही. तर कायद्याला विरोध करुन जे लोक हिंसाचार माजवून राजकारण करीत आहेत, त्याच्या पाठीमागे विरोधकांचा हात असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.

नागरिकत्व सुधारणा कायद्याचे विधेयक डिसेंबरमध्ये मांडण्यात आले. या कायद्यामध्ये आजपर्यंत सातवेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. यातील सहावेळा दुरुस्त्या काँग्रेसच्या राजवटीत झाल्या आहेत. २००३ मध्ये झालेली दुरुस्ती आणि आता केलेली दुरुस्ती या दोनच दुरुस्त्या भाजपच्या सरकारने केल्या आहेत. घटनात्मक चौकटीत राहून करण्यात आलेल्या कायद्याचे आव्हान देणाऱ्या काँग्रेसला संसदीय कार्यपद्धती, संविधान मान्य नाही, असेच यातून दिसून येत असल्याचे टीकास्त्रदेखील त्यांनी केले.