शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

सिंधूदुर्गमधील तिलारी धरणाचा डावा कालवा फुटला, लोकांनी अनुभवली पुरसदृश्य स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 11:49 AM

या कालव्यांकडे तिलारी विभागाचे होत असलेले दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार, हा या कालवा फुटीला जबाबदार असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत. यापूर्वीही माध्यमांतून या धरणाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याचे वृत्त आले आहे.

दोडामार्ग : सिंधूदुर्ग जिल्ह्यातील तिराळी धरणाचा गोवा आणि महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारा कालवा खानयाळे येथे फुटला. यामुळे येळपई नदीत ऐन उन्हाळ्यात लोकांनी पुरसदृश्य स्थिती अनुभवली. परिणामी तिराळी-दोडामार्ग दोन तासांहूनही अधिक काळ बंद राहिला. तिराळी धरण हे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे.

या कालव्यांकडे तिलारी विभागाचे होत असलेले दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार, हा या कालवा फुटीला जबाबदार असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत. यापूर्वीही माध्यमांतून या धरणाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याचे वृत्त आले आहे. मात्र, तरीही निद्रिस्त असलेल्या तिलारी विभागाला जाग येत नव्हती. यामुळे अखेर खानयाळे येथे कालव्याला मोठे भगदाड पडून कालवा फुटला. परिणामी तेथील माती व पाणी लोकांच्या शेतात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा करणारा हा कालवा बंद होत असल्यामुळे शेती करपण्याची भीतीही शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

अधिकाऱ्यांच्या दूर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत आण याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. एढेच नाही, तर प्रशासनाबरोबरच येथील आमदार, पालकमंत्री यांचेही याकडे लक्ष नाही. यामुळे या कालव्यांची योग्य दुरुस्ती आणि देखभाल होत नाही. यासंदर्भात आता, जोवर कालव्याचे पूर्ण ऑडिट होऊन त्याची संपूर्ण दुरुस्त होत नाही, तोवर यातून पाणी सोडू देणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर यांनी दिला आहे. खासदार विनायक राऊत यांनी या घटनेची माहिती घेतली असून यासंदर्भात चौकशी होणार असल्याचे विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी म्हटले आहे. याशिवाय, तिराळी विभागाची कार्यालये तिराळीत आणावीत यासाठीही येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे समजते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीfloodपूरDamधरण