शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
3
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
4
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
5
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
6
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
7
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
8
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
9
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
10
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
11
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
12
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
13
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
14
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
15
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
16
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
17
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
18
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
19
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
20
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

परतीच्या पावसाने लाखोंची हानी दोडामार्गला फटका

By admin | Published: October 27, 2014 11:23 PM

कर्जात सूट देण्याची शेतकऱ्यांची मागणी

साटेली भेडशी : शनिवार सायंकाळपासून रविवारी दुपारपर्यंत बरसणाऱ्या पावसाने भेडशी आणि परिसरातील गावातील नागरिकांना हैराण करून सोडले आहे. गेल्या महिनाभरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. सध्या परिसरातील भातशेती पिकलेली असून कापणीयोग्य झाली आहे. परंतु हाताशी आलेले पीक पावसामुळे भिजून खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. सकाळच्यावेळची थंडी, दुपारचे कडक ऊन आणि सायंकाळी पाऊस यामुळे हवामान फारच बदलले असून त्यामुळे परिसरात अनेक साथीचे रोग उत्पन्न होण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने दिले आहे. शनिवारी पडलेल्या पावसामुळे भेडशी येथील साप्ताहिक बाजारासाठी आलेल्या लहान-मोठ्या विक्रेत्यांची निराशा झाली. पावसामुळे बाजारही तेवढासा भरला नव्हता. त्यातच विजेचा लपंडाव सुरू होता. परतीच्या पावसाने या परिसरातील दीपावली शो टाईम कार्यक्रम रद्द करावे लागल्याने जनतेच्या उत्साहावर विरजण पडले. रविवारी सकाळी भेडशी येथील दामोदर मंदिराशेजारील कॉजवेवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली होती. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कापून वाळत घातलेले भात पावसामुळे वाया जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकांमार्फत दिलेल्या शेतीकर्जात काही प्रमाणात सूट मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)