शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ एमआयडीसीला घरघर सिंधुदुर्ग जिल्ह्यात

By admin | Updated: December 25, 2014 00:01 IST

‘जिल्हा उद्योग मित्र’ मध्ये उद्योगांसंदर्भात विविध समस्यांवर चर्चा होते. मात्र,

तत्कालीन राज्यमंत्री एस. एन. देसाई यांच्या प्रयत्नातून सन १९७६-७७ साली कुडाळ येथे एमआयडीसी उभारण्यात आली. सुरुवातीला या ठिकाणी वायमन गार्डन, मेल्ट्रॉन यासारख्या कंपन्यांनी मोठे कारखाने उभारले होते. त्याकाळी जिल्हाभरातून कुडाळ एमआयडीसीमध्ये लोक कामाला येत. परंतु काही वर्षातच येथील उद्योग, कारखाने बंद पडू लागले. याची प्रमुख कारणे म्हणजे मुंबई-गोवा शहरांची झपाट्याने होणारी वाढ, मालाची ने-आण करण्यासाठी वाहतुकीची समस्या, कामगारांची कमी उपलब्धता आणि प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची एमआयडीसी विषयी उदासिनता. मोठे उद्योग बंद पडू लागल्याने त्यावर आधारीत लघु उद्योगही संकटात आले. मालाची वाहतूक करण्यासाठी वाहतुकीची समस्या, पर्यटन जिल्हा असल्याने पर्यावरणास घातक उद्योगांना असलेला विरोध, एमआयडीसीकडून उद्योजकांना मिळणारे असहकार्य यामुळे येथील उद्योगांना पुन्हा उर्जितावस्था मिळण्याची शक्यता धूसरच आहे. या सगळ्यावर उपाय म्हणून येथील नैसर्गिक साधन संपत्तीवरील उद्योग-व्यवसायांना चालना देणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये काजू, आंबा, फणस, कोकम, जांभूळ, मत्स्य या व अशा घटकांवर आधारीत उद्योगांना प्रशासनाने प्रोत्साहन आणि मदत देणे आवश्यक आहे. जिल्ह्याला समृद्ध असा समुद्रकिनारा लाभल्याने येथे मत्स्य व्यवसायही आता जोर धरू लागला असून येथील मत्स्योत्पादन देशभरात आणि परदेशातही निर्यात होत आहे. मात्र, याचे प्रमाण कमीच असून मत्स्य व्यवसायवाढीसाठी चालना मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरेल.‘जिल्हा उद्योग मित्र’ मध्ये उद्योगांसंदर्भात विविध समस्यांवर चर्चा होते. मात्र, समस्या निराकरणासाठी ठोस उपाययोजना होत नाहीत. केवळ समन्वयाचे काम केले जाते. त्यामुळे या समस्या सोडविण्याकरिता कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उद्योजकांमधून उपस्थित होत आहे. रजनीकांत कदम