शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेमार्ग असुरक्षितच!

By admin | Updated: November 5, 2014 23:38 IST

सुभाष मळगी : गाड्यांचा वेग तासी ७२ किलोमीटरपर्यंत मर्यादित

रत्नागिरी : व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्यामुळेच कोकण रेल्वेवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे जीवन धोक्यात आले आहे. रुळांची दुरुस्ती व अन्य काम परिपूर्ण होईपर्यंत कोकण रेल्वेवरील सर्व गाड्या तासी ७५ किलोमीटर वेगानेच धावतील. त्यापेक्षा अधिक वेगाला परवानगी नाही. दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर व त्याची खात्री पटवून दिल्यानंतरच मार्गावरील गाड्यांचा वेग वाढवण्याची परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट आदेश २० आॅक्टोबरलाच कमिशनर फॉर रेल्वे सेफ्टीने (सीआरएस) दिल्यामुळे कोकण रेल्वे मार्गाची दुरुस्ती सुरु झाली आहे. या आदेशामुळेच व्यवस्थापनाची झोप उडाली, असे प्रतिपादन कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष मळगी यांनी पत्रकार परिषदेत केले.गेल्या पंधरा वर्षांच्या काळात कोकण रेल्वेच्या रुळांची दुरुस्ती झाली नाही, हे वास्तव आहे. त्यासाठी सुरुवातीच्या काळात रुळांचे अल्ट्रासोनिक स्कॅनिंग करण्यासाठी चार कर्मचाऱ्यांना लखनौ येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. तीन वर्षे त्यांनी हे काम केले. त्यानंतर त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांना पुन्हा रिफ्रेशर कोर्ससाठी पाठविले गेले नाही. केवळ अल्ट्रासोनिक स्कॅनिंग करु शकण्याचा अधिकार असलेला एकच कर्मचारी कोकण रेल्वेकडे उपलब्ध असून, सध्या तो कोकण रेल्वेच्या रुळाचे स्कॅनिंग करण्यात गुंतला आहे. एकटा कर्मचारी हे काम कसे आणि किती काळात करणार हाच प्रश्न आहे. याशिवाय कोकण रेल्वे मार्गावर अपघात झाला की कामगारांना जबाबदार धरले जाते. अधिकारी नामानिराळे राहतात. मात्र, कामगारांना आवश्यक साहित्य देणार कोण? हा प्रश्नही आहे. त्यामुळे कमिशनर फॉर रेल्वे सेफ्टीने हे सर्व विषय गंभीरपणे घेतले आहेत, असे मळगी म्हणाले. ते म्हणाले, कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तिवेतन योजना राबविण्याच्या मागणीनुसार सामंजस्य करार झाला. भारतीय जीवन बिमा निगमकडे पेन्शन फंड दर महिन्याला १६ टक्के भरण्याचे रेल्वे व्यवस्थापनाने मान्य केले. एलआयसीकडे पॉलिसी करुन पैसे भरण्याची कार्यवाही सुरु झाली. २००६मध्ये मात्र कर्मचाऱ्यांना न सांगता पेन्शन फंडचे पैसे इपीएफला दिले. हे चुकीचे आहे. त्यामुळे या चुकीची दुरुस्ती करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर चुकीची तत्काळ दुरुस्ती करावी, असा आदेश न्यायालयाने दिला व कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेच आहे, असेही स्पष्ट केले. तरीही गेल्या काही वर्षात १८९ कोटींचा पेन्शन फंड कोकण रेल्वेने भरलेला नाही. याबाबत माहिती विचारली असता आम्ही तोट्यात आहोत, असे सांगितले गेले. तोटा झाला, असे तायल म्हणतात, तर कर्मचाऱ्यांना घरे देण्याच्या योजनेसाठी २७ कोटी कसे काय देऊ केले, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)सुभाष मळगी उवाच...कोकण रेल्वेचे सध्याचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक भानूप्रकाश तायल यांना कोकण रेल्वेच्या व्यवस्थेपेक्षा अन्य योजनांमध्येच जास्त स्वारस्य आहे. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे कोकण रेल्वेत झालेली असून, त्यामागे तायल आणि त्यांचे रॅकेट असल्याचा घणाघाती आरोपीही मळगी यांनी केला आहे. मनमानी कारभाराचे अनेक प्रकार असून, त्यामुळे विद्यमान चेअरमनवर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात.कोकण रेल्वेमध्ये केआरसी युनियन अधिकृत झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये असलेले भीतीचे वातावरण दूर झाले आहे. प्रमोशनचे बंद दरवाजे उघडले आहेत. व्यवस्थापनातील गैरकारभार रोखण्यासाठी युनियनने दंड थोपटले आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. निवडणुका नोव्हेंबर डिसेंबर होतील. परंतु व्यवस्थापनातील गैरकाराविरुद्ध उचललेले पाऊल मागे घेतले जाणार नाही, प्रसंगी तीव्र आंदोलन छेडले जाईल.दुरुस्ती वेगात सुरुकमिशनर फॉर रेल्वे सेफ्टीने (सीआरएस) दिल्यामुळे कोकण रेल्वे मार्गाची दुरुस्ती सुरु.आदेशामुळेच व्यवस्थापनाची झोप उडाल्याचा मळगींचा आरोप.गेल्या पंधरा वर्षांच्या काळात कोकण रेल्वेच्या रुळांची दुरुस्ती झाली नसल्याचा आरोप.अल्ट्रासोनिक स्कॅनिंग करु शकण्याचा अधिकार असलेला एकच कर्मचारी कोकण रेल्वेकडे उपलब्ध.