शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तिलारीच्या पाण्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी

By admin | Updated: October 31, 2014 23:31 IST

खलिद अन्सारी : तिलारी येथे अधीक्षक अभियंत्यांची बैठक

कसई दोडामार्ग : तिलारी धरणात १४ टीएमसी एवढा मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. १६ कोटी रुपये खर्च केले. मात्र, सिंचन क्षेत्रासाठी अतिशय नगण्य पाण्याचा वापर होतो, अशी खंत व्यक्त करून पाण्याचा वापर जास्तीत जास्त शेतकरी कसे करतील, यासाठी तालुकाभर पाण्याचे नियोजन करा. तिलारी धरणाच्या वरील बाजूस पाणी कोणाला पाहिजे असेल, तर द्या. जास्तीत जास्त सिंचन क्षेत्र पाण्याखाली येणे आवश्यक आहे. अशा सूचना तिलारी कालवा विभागाचे अधीक्षक अभियंता खलिद अन्सारी यांनी तिलारी येथे आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. गोवा व महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने तिलारी आंतरराज्य प्रकल्प पूर्णत्वास आला. १६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या धरणात १४ टीएमसी एवढा मुबलक पाणी साठा आहे. गोवा राज्याने या पाण्याचा वापर योग्य प्रकारे केला आणि सिंंचनक्षेत्र वाढविले. मात्र, दोडामार्ग तालुक्यात ज्याप्रमाणे पाण्याचा वापर होणे आवश्यक आहे, तसा होत नाही. त्यामुळे धरणात पाणी असूनसुध्दा त्याचा वापर होत नसल्याने तिलारी कालवा विभाग चांगलाच अडचणीत सापडला आहे. पाण्याचा वापर सिंचन क्षेत्रासाठी व्हावा, यासाठी गुरुवारी तिलारी रेस्ट हाऊस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कार्यकारी अभियंता धीरज साळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, सभापती महेश गवस, उपसभापती आनंद रेडकर, माजी सभापती सीमा जंगले, गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, विस्तार अधिकारी जी. ए. धरणे, उपविभागीय अधिकारी एस. एस. थोरात, वि. ग. देसाई, मंडळ कृषी अधिकारी तसेच खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी राजेंद्र म्हापसेकर म्हणाले, शेतकऱ्यांपर्यंत जाऊन आधुनिक दर्जेदार पिके घेण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. जेणेकरून पाण्याचा जास्तीत जास्त वापर होईल. कोलझर, झोळंबे, तळकट या भागात मोठ्या प्रमाणात बागायती आहे. त्यांना कालवा काढून पाणी द्या. तसेच उसप, खोक्रल, पिकुळे या गावांनाही पाणी द्या, असे सांगितले. त्यावर अन्सारी यांनी सांगितले की, कोलझर, झोळंबे, तळकट या गावांना पाणी देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. तसेच पिकुळे, खोक्रल, उपस गावांनाही पाणी देण्यासाठी तरतूद केली आहे. विर्डी धरणाच्या पाण्याचेही नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. प्रशांत चव्हाण म्हणाले, तिलारी कालवा विभागाच्या अंतर्गत नऊ ग्रामपंचायती येतात. त्यांनाही पाणीपट्टी भरण्यासाठी पत्रे, नोटिसा आल्या. सुमारे १६ लाख ६१ हजार एवढी पाणीपट्टी आली. मात्र, या ग्रामपंचायती ही पाणीपट्टी भरण्यास तयार नाहीत. धरण अलिकडचे आहे. मात्र, त्या अगोदरपासून आमचे पाण्याचे स्त्रोत आहेत, असे सांगितले. यावर अन्सारी यांनी, नियमाप्रमाणे पाणीपट्टी भरावीच लागणार आहे. यासाठी अन्य मार्गही काढला जाऊ शकतो, असे त्यांनी सुचविले. कृषी अधिकारी कांबळी यांनी सांगितले की, या भागातील शेतकरी दोन हंगामात शेती करतात. तीच शेती हंगामात केल्यास पाण्याचा वापर होईल व शेतकऱ्यांना पिकांच्या रुपात पैसा मिळेल. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अन्सारी यांनी सांगितले. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तालुक्यात फिरून शेतकऱ्यांशी संपर्क साधावा. त्यांचे म्हणणे ऐकावे. तसेच पडीक जमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी पाणीवाटप संस्था स्थापन करा, असे आवाहन अधीक्षक अभियंता खलिद अन्सारी यांनी केले. (वार्ताहर)