शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

भाजपच्या मतावर जिंकलेल्या खासदारकीचा प्रथम राजीनामा द्या ! -- प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 3:54 PM

तारीख पे तारीख ' देणार्‍या खासदार संजय राऊत याना आमचे जाहीर आव्हान आहे. संजय राऊत हे सातत्याने भाजपाबाबत जेवढे वाईट बोलता येईल तेवढे बोलत आहेत. एवढी भाजप वाईट होती, अस्पृश्य होती, भाजपापासुन एवढा धोका होता तर भाजपाबरोबर महायुतीच्या भानगडीत का पडलात ?

ठळक मुद्देशिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी सरकार म्हणजे तीन पैशाचा तमाशा!

कणकवली : शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन पक्षांचे सरकार म्हणजे ' तिन पायांची शर्यत , तीन पैशाचा तमाशा ' होणार आहे. महायुतीच्या नावाखाली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणुक लढवायची आणि भाजपच्या दोन लाख मतांच्या जोरावर विजयी व्हायचे आणि आता भाजपवर टीका करायची हे बरे नव्हे. एवढेच भाजप जर तुम्हाला नकोसे वाटत असेल तर प्रथम भाजपच्या जिवावर विजयी झालेल्या खासदारकीचा राजीनामा द्या. त्यानंतर टीका करा आणि निवडणुक लढवुन पुन्हा निवडुन येऊन दाखवा असे खुले आव्हान भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यानी खासदार विनायक राऊत यांना दिले आहे.कणकवली येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत वाहतुक संघटना जिल्हाध्यक्ष शिशीर परुळेकर, सुरेश सावंत उपस्थित होते.यावेळी प्रमोद जठार म्हणाले, ' तारीख पे तारीख ' देणार्‍या खासदार संजय राऊत याना आमचे जाहीर आव्हान आहे. संजय राऊत हे सातत्याने भाजपाबाबत जेवढे वाईट बोलता येईल तेवढे बोलत आहेत. एवढी भाजप वाईट होती, अस्पृश्य होती, भाजपापासुन एवढा धोका होता तर भाजपाबरोबर महायुतीच्या भानगडीत का पडलात ? असा सवाल करतानाच जठार म्हणाले, लोकसभा निवडणुक लढताना महायुतीची गरज होती . मात्र, राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळेल असे जेव्हा तुम्हाला वाटले , तेव्हा युती नकोशी झाली. असे का ?शिवसेनेच्या महाराष्ट्रातील खासदारानी राजीनामे द्यावे व भाजपशिवाय निवडुन येऊन दाखवावे. हे खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांना आमचे आव्हान आहे. भाजपबाबत एवढी नाक मुरडता मग तुम्हाला भाजपच्या जीवावर मिळालेली खासदारकी कशी चालते ? महाराष्ट्रात तुम्ही सत्ता स्थापन करा. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत . परंतु हे सरकार तीन वर्षे तरी टिकेल का ? याचा विचार करा.खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एवढ्यावेळा भेटले आहेत की, जेवढी भेट खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची झाली नसेल. याचाच अर्थ शिवसेना सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जावू शकते असा होतो . शिवसेनेचे ६३ आमदार आज घाबरलेल्या स्थितीत आहेत. शिवसेना आमदारांचे म्हणणे आहे कि, आम्हाला काँग्रेस,राष्ट्रवादीच्या दावणीला बांधु नका. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आपल्या भवितव्याची काळजी करत आहेत. मात्र आमच्या भवितव्याचे काय ? असा साधासोपा प्रश्न या आमदारांना पडला असल्याचे प्रमोद जठार यानी यावेळी सांगितले.'पोटात एक आणि बाहेर एक' असे का?शिवसेनेने खासदार अरविंद सावंत यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना विरोधी बाकावर बसणार हे निश्चित झाले. मग खासदारांची सभागृहात बसण्याची जागा बदलण्यात आली यात काय चुकले ? त्याविषयावरून भाजपवर टीका करणाऱ्यांनीशिवसेनेच्या ' पोटात एक आणि बाहेर एक' अशी भूमिका का? याचे उत्तर द्यावे . असेही प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूरBJPभाजपा