शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाऊस हटेना; शेतात चिखल, कापणी करायची कशी?, भात उत्पादनावर होणार परिणाम

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 1, 2024 12:16 IST

सुगी तोंडावर अन् परतीचा पाऊस मुळावर

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : परतीच्या पावसाचे ढग जिल्ह्यातून हटण्याचे नावच घेत नाहीत. गेले आठ ते दहा दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने भाताच्या शेतात चिखल झाला आहे. पाणी साचून राहिल्याने काढणीला आलेले पीक काढणीविना वाया जात आहे.ऑक्टोबर महिन्याचा गुरूवार ३१ हा शेवटचा दिवस संपला तरी पाऊस काही जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. दररोज सायंकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे कापणीला आलेले भातपीक शेतात आडवे झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ही स्थिती आहे. विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

बळीराजा चिंताग्रस्तजिल्ह्यात ५५ ते ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतीला बहर आला आहे. पाऊस उत्तम झाल्याने भातपीक चांगले भरून आले आहे. त्यामुळे यंदा भाताचे उत्पादनवाढीची शक्यता होती. मात्र, परतीच्या पावसात भाताची नासाडी होत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

तयार झालेल्या भातपीकाची दैनागेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने विविध ठिकाणी थैमान घातले आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सायंकाळी विजांचा आणि ढगांचा गडगडाट होत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाहले आहे. नवरात्री उत्सवादरम्यान किवा दसऱ्यानंतर शेतकरी शक्यतो तयार झालेले पीक कापण्यास सुरूवात करतात. मात्र, पाऊस लांबल्याने तयार झालेल्या भाताची दैना झाली असून आता त्यापैकी घरात किती येणार हा प्रश्नच आहे.

नुकसान भरपाई द्यावी

  • ऐन दिवाळीत बळीराजाची दिवाळी शेतात तर मोत्याचे धान चिखलात लोळत असल्याने बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळे शासनाने सरसकट नुकसानभरपाई जाहीर करून ती द्यावी, अशी मागणी होत आहे.
  • जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत चार हजार मिलीमीटरच टप्पा गाठला असून ही गेल्या चार वर्षातील विक्रमी नोंद आहे.
  • आता परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. शेत लागवडीसाठी खर्च केलेले पैसेसुद्धा पदरात पडणार की नाही. या विवंचनेत येथील शेतकरी आहे.

भातशेतीचे पंचनामे करा

  • सतत पडणार्या पावसाने पिकलेले भातपीक आडवे झाले आहे. परतीच्या पावसाने भातशेती धोक्यात आली आहे.
  • भाताचे पीक कुजण्याची शक्यता आहे. पंचनामा करून भात पिकाची नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे.
  • सर्व शासकीय यंत्रणा सध्या निवडणुकीच्या कामात मग्न आहे. त्यामुळे त्यातून काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळ काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे.

यंदा सुरूवातीपासून चांगला पाऊस पडल्याने भातपीक चांगले आले होते. दिवाळीपर्यंत सुगीचा हंगाम सुरू होईल, असा विश्वास होता. मात्र, परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. काही शेतकर्यांचे भात अक्षरश: शेतात झोपले आहे. पीक कुजण्याचे तसेच भाताच्या दाण्यांना मोड येऊन भातपिकाचे नुकसान झाले असून शासनाने सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गाची आहे. - शशिकांत सरनाईक, शेतकरी, माळगाव, मालवण. 

माणगाव खोऱ्यात बहुतांश भातशेती कापणीसाठी सज्ज आहे. असे असताना पावसाने धिंगाणा घातला आहे. कापणीच्या हंगामास पावसामुळे विलंब झाला असून परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. पूर्ण भातपीक पाण्यात आहे. त्यामुळे आमचा नाईलाज झाला आहे. - गुरूनाथ पालकर, शेतकरी, माणगाव

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसfarmingशेती