शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाऊस हटेना; शेतात चिखल, कापणी करायची कशी?, भात उत्पादनावर होणार परिणाम

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 1, 2024 12:16 IST

सुगी तोंडावर अन् परतीचा पाऊस मुळावर

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : परतीच्या पावसाचे ढग जिल्ह्यातून हटण्याचे नावच घेत नाहीत. गेले आठ ते दहा दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने भाताच्या शेतात चिखल झाला आहे. पाणी साचून राहिल्याने काढणीला आलेले पीक काढणीविना वाया जात आहे.ऑक्टोबर महिन्याचा गुरूवार ३१ हा शेवटचा दिवस संपला तरी पाऊस काही जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. दररोज सायंकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे कापणीला आलेले भातपीक शेतात आडवे झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ही स्थिती आहे. विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

बळीराजा चिंताग्रस्तजिल्ह्यात ५५ ते ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतीला बहर आला आहे. पाऊस उत्तम झाल्याने भातपीक चांगले भरून आले आहे. त्यामुळे यंदा भाताचे उत्पादनवाढीची शक्यता होती. मात्र, परतीच्या पावसात भाताची नासाडी होत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

तयार झालेल्या भातपीकाची दैनागेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने विविध ठिकाणी थैमान घातले आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सायंकाळी विजांचा आणि ढगांचा गडगडाट होत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाहले आहे. नवरात्री उत्सवादरम्यान किवा दसऱ्यानंतर शेतकरी शक्यतो तयार झालेले पीक कापण्यास सुरूवात करतात. मात्र, पाऊस लांबल्याने तयार झालेल्या भाताची दैना झाली असून आता त्यापैकी घरात किती येणार हा प्रश्नच आहे.

नुकसान भरपाई द्यावी

  • ऐन दिवाळीत बळीराजाची दिवाळी शेतात तर मोत्याचे धान चिखलात लोळत असल्याने बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळे शासनाने सरसकट नुकसानभरपाई जाहीर करून ती द्यावी, अशी मागणी होत आहे.
  • जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत चार हजार मिलीमीटरच टप्पा गाठला असून ही गेल्या चार वर्षातील विक्रमी नोंद आहे.
  • आता परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. शेत लागवडीसाठी खर्च केलेले पैसेसुद्धा पदरात पडणार की नाही. या विवंचनेत येथील शेतकरी आहे.

भातशेतीचे पंचनामे करा

  • सतत पडणार्या पावसाने पिकलेले भातपीक आडवे झाले आहे. परतीच्या पावसाने भातशेती धोक्यात आली आहे.
  • भाताचे पीक कुजण्याची शक्यता आहे. पंचनामा करून भात पिकाची नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे.
  • सर्व शासकीय यंत्रणा सध्या निवडणुकीच्या कामात मग्न आहे. त्यामुळे त्यातून काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळ काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे.

यंदा सुरूवातीपासून चांगला पाऊस पडल्याने भातपीक चांगले आले होते. दिवाळीपर्यंत सुगीचा हंगाम सुरू होईल, असा विश्वास होता. मात्र, परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. काही शेतकर्यांचे भात अक्षरश: शेतात झोपले आहे. पीक कुजण्याचे तसेच भाताच्या दाण्यांना मोड येऊन भातपिकाचे नुकसान झाले असून शासनाने सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गाची आहे. - शशिकांत सरनाईक, शेतकरी, माळगाव, मालवण. 

माणगाव खोऱ्यात बहुतांश भातशेती कापणीसाठी सज्ज आहे. असे असताना पावसाने धिंगाणा घातला आहे. कापणीच्या हंगामास पावसामुळे विलंब झाला असून परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. पूर्ण भातपीक पाण्यात आहे. त्यामुळे आमचा नाईलाज झाला आहे. - गुरूनाथ पालकर, शेतकरी, माणगाव

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसfarmingशेती