शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

CoronaVirus: आम्हाला गावाकडे जाऊ द्या; गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गवासीयांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:06 AM

लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे गोव्यात अडकले

- सचिन खुटवळकरदोडामार्ग : लॉकडाऊन व कर्फ्यूमुळे संचारबंदीसोबतच गोव्याच्या सीमेबाहेर जाणे अशक्य बनले आहे. अशा स्थितीत पुढचे २० दिवस कसे काढायचे, हा यक्षप्रश्न गोव्यात कामानिमित्त वास्तव्यास असलेल्यांना सतावत आहे. आता त्यांना वेध लागले आहेत ते गावी परतण्याचे. पण परतीचे मार्ग बंद असल्यामुळे सिंधुदुर्ग व गोव्याच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आम्हाला गावाकडे नेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.

दोडामार्ग तालुक्यातील वायंगणतड येथील मनीषा तुकाराम नाईक यांनी आपबिती 'लोकमत'कडे कथन केली. त्या म्हणाल्या, मी दोन मुलांसह पणजीजवळ चिंबल राहते. गावाकडे जायचे तर वाहतुकीची व्यवस्था नाही. घरातच राहायचे, तर जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आहे. कर्फ्यूमुळे घराबाहेर पडता येत नाही. आम्हाला सिंधुदुर्गमध्ये जायचे आहे. गोवा सरकार व सिंधुदुर्गच्या लोकप्रतिनिधींनी विशेष हेल्पलाइनच्या माध्यमातून आम्हाला घरी पोहोचण्यासाठी सहकार्य करावे. 

मळगाव-सावंतवाडी येथील सचिन राऊळ हा युवक फोंडा येथे अडकला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, असे शेकडो सिंधुदुर्गवासीयांची गोव्यात राहत्या घरात कोंडी झाली आहे. काही घरमालक रूम सोडून जाण्यासाठी दबाव आणत आहेत. घरातील जीवनावश्यक वस्तू संपत आहेत. संचारबंदीमुळे वेठीस धरल्यासारखी अवस्था झाली आहे. या स्थितीत किमान सिंधुदुर्गमध्ये जाऊ देण्याकरिता मुभा मिळायला हवी. हवे तर आमच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करा, पण एकदा घरी जाऊ द्या. लॉकडाऊन किती दिवस चालेल, ते सांगता येणार नाही. त्यामुळे जगायचे असेल, तर गाव गाठणे हाच योग्य पर्याय आहे. त्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न व्हायला हवे.

दरम्यान, संचारबंदी लागू होण्यापूर्वी काही नागरिकांनी दोडामार्ग व पत्रादेवीमार्गे सिंधुदुर्गमध्ये प्रवेश केला. कोरोनाचे संकट टळेपर्यंत पुन्हा गोव्याच्या हद्दीत प्रवेश न देण्याच्या अटीवर त्यांना जाऊ देण्यात आले. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या लोकप्रतिनिधींनी पोलीस यंत्रणेला विश्वासात घेऊन सिंधुदुर्गवासीयांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस