शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

यशवंत बँकेला अडीच कोटींचा ढोबळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:38 IST

कराड : नुकत्याच झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात यशवंत बँकेला २.५० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय ...

कराड :

नुकत्याच झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात यशवंत बँकेला २.५० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय ३३३ कोटी इतका झाला असून, यामध्ये १८९ कोटींच्या ठेवी, तर १४४ कोटींची कर्जे वितरीत केली आहेत. बँकेची गुंतवणूक ५३ कोटी इतकी झाली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे की, मागील आर्थिक वर्षात कोरोना संसर्गामुळे बाजारपेठेत मंदीचे वातावरण राहूनही बँकेने व्यवसाय वाढ करण्यात व नफा मिळवण्यात सातत्य राखले आहे. बँकेत प्रत्येक ठेवीदारास मिळणारे ५ लाखापर्यंतचे ठेव विमा संरक्षण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कोविडच्या काळातसुद्धा बँकेने आपले कामकाज अखंडपणे चालू ठेवत ग्राहकांना नियोजनबद्ध, नम्र व जलद सेवा दिली आहे.

बँकेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली, पुणे, रत्नागिरी व सोलापूर या जिल्ह्यांचे असून, सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने बँकेच्या भागभांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे. लेखापरीक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके बँकेने पूर्ण करून सन २०१९-२० या मागील आर्थिक वर्षासाठी बँकेस शासकीय लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळवला होता. याही आर्थिक वर्षासाठी बँकेने आवश्यक ती सर्व प्रमाणके पूर्ण केली आहेत. ठेव, कर्जे, भागभांडवल, गुंतवणूक या सर्वात वाढ करत मागील वर्षीच्या तुलनेत एनपीएचे प्रमाण कमी करण्यात बँकेला यश आले आहे.

सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक व पतसंस्थांसाठी ठेवीच्या व कर्जांच्या आकर्षक योजना मागील वर्षात बँकेने राबविल्या; त्यास ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. नव्या वर्षात छोट्या उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदराच्या कर्ज योजना सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहकांना ATM, मोबाईल बँकिंग व QR कोड द्वारे व्यवहार अशा अनेक सोयी देण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. आपल्या भक्कम पायावर आगामी सर्व आर्थिक बदलांना सामोरे जाण्यास बँक सक्षम असल्याचे चरेगावकर म्हणाले.

कर्जवसुलीसाठी काही कर्जदारांवर व कामात हयगय करणाऱ्या काही कर्मचारी वर्गाबाबत कठोर निर्णय घ्यावे लागले. मात्र, यामुळे वसुली चांगली झाली. यापुढेही यात सातत्य राखले जाऊन ठेवीदारांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिली जाईल, असेही चरेगावकर यांनी सांगितले. (वा प्र )

फोटो - शेखर चरेगावकर