शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

यशवंत बँकेला अडीच कोटींचा ढोबळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:38 IST

कराड : नुकत्याच झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात यशवंत बँकेला २.५० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय ...

कराड :

नुकत्याच झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात यशवंत बँकेला २.५० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय ३३३ कोटी इतका झाला असून, यामध्ये १८९ कोटींच्या ठेवी, तर १४४ कोटींची कर्जे वितरीत केली आहेत. बँकेची गुंतवणूक ५३ कोटी इतकी झाली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे की, मागील आर्थिक वर्षात कोरोना संसर्गामुळे बाजारपेठेत मंदीचे वातावरण राहूनही बँकेने व्यवसाय वाढ करण्यात व नफा मिळवण्यात सातत्य राखले आहे. बँकेत प्रत्येक ठेवीदारास मिळणारे ५ लाखापर्यंतचे ठेव विमा संरक्षण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कोविडच्या काळातसुद्धा बँकेने आपले कामकाज अखंडपणे चालू ठेवत ग्राहकांना नियोजनबद्ध, नम्र व जलद सेवा दिली आहे.

बँकेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली, पुणे, रत्नागिरी व सोलापूर या जिल्ह्यांचे असून, सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने बँकेच्या भागभांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे. लेखापरीक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके बँकेने पूर्ण करून सन २०१९-२० या मागील आर्थिक वर्षासाठी बँकेस शासकीय लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळवला होता. याही आर्थिक वर्षासाठी बँकेने आवश्यक ती सर्व प्रमाणके पूर्ण केली आहेत. ठेव, कर्जे, भागभांडवल, गुंतवणूक या सर्वात वाढ करत मागील वर्षीच्या तुलनेत एनपीएचे प्रमाण कमी करण्यात बँकेला यश आले आहे.

सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक व पतसंस्थांसाठी ठेवीच्या व कर्जांच्या आकर्षक योजना मागील वर्षात बँकेने राबविल्या; त्यास ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. नव्या वर्षात छोट्या उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदराच्या कर्ज योजना सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहकांना ATM, मोबाईल बँकिंग व QR कोड द्वारे व्यवहार अशा अनेक सोयी देण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. आपल्या भक्कम पायावर आगामी सर्व आर्थिक बदलांना सामोरे जाण्यास बँक सक्षम असल्याचे चरेगावकर म्हणाले.

कर्जवसुलीसाठी काही कर्जदारांवर व कामात हयगय करणाऱ्या काही कर्मचारी वर्गाबाबत कठोर निर्णय घ्यावे लागले. मात्र, यामुळे वसुली चांगली झाली. यापुढेही यात सातत्य राखले जाऊन ठेवीदारांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिली जाईल, असेही चरेगावकर यांनी सांगितले. (वा प्र )

फोटो - शेखर चरेगावकर