शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

..तर येरळा खळखळून वाहू लागेल

By admin | Updated: January 16, 2016 00:24 IST

प्रभाकर देशमुख : सेवागिरी यात्रेच्या सांगता कार्यक्रमात विश्वास व्यक्त; ट्रस्टकडून कर्मचाऱ्यांचा सत्कार

पुसेगाव : ‘पडणाऱ्या पावसाचे पाणी हे आपल्या हक्काचे असून, जोपर्यंत या पाण्याचा थेंबन्थेंब साठवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत नाहीत, तोपर्यंत समाज पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार नाही. खटावसारख्या दुष्काळी भागात पाणी अडविण्याची खरी गरज ओळखून येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने सुरू केलेल्या येरळानदी पुनरुज्जीवन प्रकल्पास नदीकाठच्या गावातील लोकांनी खऱ्या अर्थाने साथ दिल्यास कोरडी येरळा नदी पुन्हा खळखळून वाहू लागेल,’ असा विश्वास राज्याचे जलसंधारण व रोहयो सचिव प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला.सेवागिरी महाराजांच्या ६८ व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव येथे दि. ४ ते १४ जानेवारी या कालावधीत भरविण्यात आलेल्या वार्षिक यात्रेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, बँक आॅफ महाराष्ट्र क्षेत्र साताराचे अंचल महाप्रबंधक अहिल थोरात, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.देशमुख म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांपासून या भागात पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याची भूगर्भातील पातळी अंत्यत खालावली आहे. आगामी काळात जलसंधारणाच्या कामाला तसेच भागातील ओढे, नद्या वाहत्याजिवंत करण्याच्या कामाला प्राधान्य न दिल्यास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. नदी पात्रातील वाळू म्हणजे पाणी साठवणारी गुहा आहे. त्यामुळे नद्यांचे, ओढ्यांचे पुनरुज्जीवन करताना त्या पात्रात खडकापर्यंत न जाता खोलीकरण व रुंदीकरण केले पाहिजे, तरच पाणी मुरण्यास संधी मिळेल. सध्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची नद्या पुनरुज्जीवन करण्याची कामे सुरू आहेत. यासाठी १०० कोटींचा विशेष निधी राखून ठेवला आहे.’डॉ. जाधव म्हणाले, ‘महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने येरळा नदीच्या पुनरुज्जीवनाचे मोठे काम श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केले आहे. गावाच्या शिवारात सुमारे पाच किलोमीटर परिसरात येरळा नदीचे व नदीला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण पूर्ण झाले आहे.’ यात्राकाळात सहकार्य करणाऱ्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. तेसच बक्षीसप्राप्त जातिवंत जनावरांच्या मालकांना देवस्थानच्या वतीने प्रशस्तिपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. मोहन गुरव यांनी सूत्रसंचलन केले. (प्रतिनिधी)नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : मुदगलजिल्हाधिकारी म्हणाले, ‘यात्रेशी संबंधित प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्याने यात्रा शांततेत पार पडली. देवस्थान ट्रस्टने जलसंधारणाच्या कामाबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. येरळा नदी पुनरुज्जीवन विषय सोपा नाही. मात्र, नदीकाठच्या गावातील लोकांनी येरळा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमात सक्रिय सहभाग दाखवल्यास दुष्काळी भाग सुजलाम्-सुफलाम् होईल. शासन तुमच्या पाठीशी आहे; पण तुम्ही समाजासाठी सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे नमूद करून हा प्रकल्प करत असताना नदी, ओढ्याकाठला अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली.