शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

..तर येरळा खळखळून वाहू लागेल

By admin | Updated: January 16, 2016 00:24 IST

प्रभाकर देशमुख : सेवागिरी यात्रेच्या सांगता कार्यक्रमात विश्वास व्यक्त; ट्रस्टकडून कर्मचाऱ्यांचा सत्कार

पुसेगाव : ‘पडणाऱ्या पावसाचे पाणी हे आपल्या हक्काचे असून, जोपर्यंत या पाण्याचा थेंबन्थेंब साठवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत नाहीत, तोपर्यंत समाज पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार नाही. खटावसारख्या दुष्काळी भागात पाणी अडविण्याची खरी गरज ओळखून येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने सुरू केलेल्या येरळानदी पुनरुज्जीवन प्रकल्पास नदीकाठच्या गावातील लोकांनी खऱ्या अर्थाने साथ दिल्यास कोरडी येरळा नदी पुन्हा खळखळून वाहू लागेल,’ असा विश्वास राज्याचे जलसंधारण व रोहयो सचिव प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला.सेवागिरी महाराजांच्या ६८ व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव येथे दि. ४ ते १४ जानेवारी या कालावधीत भरविण्यात आलेल्या वार्षिक यात्रेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, बँक आॅफ महाराष्ट्र क्षेत्र साताराचे अंचल महाप्रबंधक अहिल थोरात, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.देशमुख म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांपासून या भागात पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याची भूगर्भातील पातळी अंत्यत खालावली आहे. आगामी काळात जलसंधारणाच्या कामाला तसेच भागातील ओढे, नद्या वाहत्याजिवंत करण्याच्या कामाला प्राधान्य न दिल्यास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. नदी पात्रातील वाळू म्हणजे पाणी साठवणारी गुहा आहे. त्यामुळे नद्यांचे, ओढ्यांचे पुनरुज्जीवन करताना त्या पात्रात खडकापर्यंत न जाता खोलीकरण व रुंदीकरण केले पाहिजे, तरच पाणी मुरण्यास संधी मिळेल. सध्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची नद्या पुनरुज्जीवन करण्याची कामे सुरू आहेत. यासाठी १०० कोटींचा विशेष निधी राखून ठेवला आहे.’डॉ. जाधव म्हणाले, ‘महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने येरळा नदीच्या पुनरुज्जीवनाचे मोठे काम श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केले आहे. गावाच्या शिवारात सुमारे पाच किलोमीटर परिसरात येरळा नदीचे व नदीला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण पूर्ण झाले आहे.’ यात्राकाळात सहकार्य करणाऱ्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. तेसच बक्षीसप्राप्त जातिवंत जनावरांच्या मालकांना देवस्थानच्या वतीने प्रशस्तिपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. मोहन गुरव यांनी सूत्रसंचलन केले. (प्रतिनिधी)नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : मुदगलजिल्हाधिकारी म्हणाले, ‘यात्रेशी संबंधित प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्याने यात्रा शांततेत पार पडली. देवस्थान ट्रस्टने जलसंधारणाच्या कामाबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. येरळा नदी पुनरुज्जीवन विषय सोपा नाही. मात्र, नदीकाठच्या गावातील लोकांनी येरळा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमात सक्रिय सहभाग दाखवल्यास दुष्काळी भाग सुजलाम्-सुफलाम् होईल. शासन तुमच्या पाठीशी आहे; पण तुम्ही समाजासाठी सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे नमूद करून हा प्रकल्प करत असताना नदी, ओढ्याकाठला अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली.