शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यापकांचे मूल्यमापन होणार तरी कधी?

By admin | Updated: November 28, 2014 23:52 IST

खासगी शाळा अनुत्सुक : शासनाच्या ‘चावडीवाचन’ योजनेचा बोजवारा

फलटण : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्याबरोबरच त्यांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांच्याही गुणवत्तेचे मूल्यमापन करणाऱ्या चावडीवाचन योजनेला काही शिक्षक व खासगी शाळांमधून खो घातला गेला असून या चांगल्या योजनेला शिक्षकांनी व शाळांनी पाठबळ देण्याची अपेक्षा पालकवर्गातून व्यक्त होत आहे.
प्रत्येकाला शिक्षण मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळावे ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अनेक योजना राबविल्या जात असून, त्यात मध्यान्ह भोजनासारख्या मोठ्या योजनांचाही समावेश आहे.
काही महिन्यांपूर्वी शासनाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये भर घालण्यासाठी चावडीवाचन या अत्यंत चांगल्या योजनेची घोषणा केली. शाळेमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिले जातात; मात्र शाळेत आपल्या मुलाने किती ज्ञानार्जन केले याची पालकांना उत्सुकता असते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्याबरोबरच त्यातून शिक्षकांच्याही गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी चावडीवाचन ही सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाची योजना सुरू करण्यात आली.
महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी चावडीवाचनाचे आयोजन करण्याचे आदेश आहेत; मात्र काही शिक्षकांनी जनप्रबोधन न केल्याने पालकांना योजनेची माहिती नाही. प्रामाणिक व गुणवत्तेवर विश्वास असणाऱ्या काही शिक्षकांनी ही योजना प्रामाणिकपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात असून, खासगी शाळांमध्ये याबद्दल अनास्था दिसत आहे. काहीजण पळवाटा शोधून ही योजना कशीबशी राबविताना दिसत आहेत. ग्रामीण भागात काही पालक निरक्षर असल्याने काही ठिकाणी ही योजना कागदोपत्रीही राबविली जात आहे. योजना चांगली असली तरी याबाबत प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली. (प्रतिनिधी)

अशी आहे योजना
या योजनेनुसार गावच्या चावडीवर अथवा चौकात पालक, मुले, शिक्षक आणि सरकारी अधिकारी यांच्यासमोर विद्यार्थी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करणार आहेत. यामध्ये धडा अथवा कवितेचे वाचन, वृत्तपत्राचे वाचन आदींचे सादरीकरण होणार असून, उपस्थित नागरिक व अधिकारी मूल्यमापन करणार आहेत. विद्यार्थ्यांची निवड उपस्थित ग्रामस्थ करणार आहेत. शिक्षकांचा खऱ्या अर्थाने कस लागेल, अशी ही योजना आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे.