शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्न लवकरच निकाली काढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : ‘मायणी परिसरातील गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठीचे निवेदन दिवड (ता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : ‘मायणी परिसरातील गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठीचे निवेदन दिवड (ता. माण) येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. यावेळी या भागातील पाणी प्रश्न लवकरच निकाली काढू,’ असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

सातारा-सांगली जिल्ह्यांच्या सीमा भागातून सोलापूर जिल्ह्यात टेंभू योजनेचे पाणी जात आहे. हे पाणी खटाव तालुक्याच्या कलेढोण गावाच्या हद्दीजवळून जात आहे. तसेच या टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रात परिसरातील पाचवड, मुळकवाडी, कलेढोण, अनफळे, पडळ, औतरवाडी, ढोकळवाडी, गारुडी, तरसवाडी, ढोकळवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे, हिवरवाडी, गारळेवाडी, कठरेवाडी, आगासवाडी या सोळा गावांचा समावेश आहे.

गेल्या दोन दशकांपासून या गावांना शेतीसाठी टेंभू योजनेचे पाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपर्यंत अनेक लहान-मोठी आंदोलने केली. तरीही शासन दरबारी कोणतीही दखल घेतली गेली नाही. येथील सोळा गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन टेंभू पाण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून लढा उभा केला आहे. या लढ्यासाठी एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी दिवड (ता. माण) या ठिकाणी विविध विकासकामांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यांच्याकडे निवेदन दिले.

परिसरातील सोळा गावांतील ग्रामस्थांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीने निवेदन तयार केले होते. या तयार केलेल्या निवेदनामध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी गावांना द्यावे, पाणी मिळाले तर युवकांचा हाताला रोजगार उपलब्ध होईल असे म्हटले होते. संबंधित परिसरातील सोळा गावांच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवेदन दिले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच या भागातील शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू असे आश्वासन दिले.

(चौकट)

ठोस भूमिका घेणे गरजेचे...

या सोळा गावांतील शेती फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या ठिकाणी कोणतीही ठोस पाणी योजना नाही. त्यामुळे अनेकवेळा निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाते. तर आलेले पीक जगविण्यासाठी या भागातील शेतकरी प्रसंगी पाणी विकत घेऊन शेती व्यवसाय करतात. त्यामुळे शासनाने या भागातील सोळा गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. तसेच यावर ठोस भूमिका घेणे तितकेच गरजेचे आहे.

२६मायणी

दिवड (ता. माण) येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टेंभू योजनेच्या पाण्यासंदर्भात सोळा गावातील ग्रामस्थांनी निवेदन दिले.

(छाया : संदीप कुंभार)