शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १२६४ किलोमीटर रस्त्याची अतिवृष्टीत ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात जीवित, शेती, पिकांची हानी झाली. तसेच जिल्हा परिषदेकडील तब्बल १२६४ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात जीवित, शेती, पिकांची हानी झाली. तसेच जिल्हा परिषदेकडील तब्बल १२६४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची वाट लागली. सर्वाधिक रस्त्यांचे नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे. या रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी १९ कोटी तर कायमस्वरूपी दुरुस्त करण्यासाठी १०७ कोटी लागण्याचा प्राथमिक अहवाल आहे. दरम्यान, रस्ते दुरुस्त होईपर्यंत धोकादायक प्रवास असणार आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर, कास, पाटण या तालुक्यांत तुफान पाऊस पडला होता. पुरामुळे रस्ते तुटून गेले, पूल वाहिले. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या स्थानिक ग्रामस्थ प्रशासनाच्या मदतीने रस्ते दुरुस्त करत आहेत. पण, रस्ते कायमस्वरूपी सुरू होण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टीत प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदेकडील १२६४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये पाटण तालुक्यात ५१२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना फटका बसला. तर वाई तालुक्यात २३० किलोमीटर, महाबळेश्वर तालुक्यात १९८ किलोमीटर, कऱ्हाड १५७, सातारा १२१, जावळी तालुक्यात ४६ किलोमीटर लांबीचे रस्ते नादुरुस्त झाले आहेत. हे सर्व रस्ते ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग आहेत. माती भराव वाहून जाणे, दरड कोसळून रस्ता बंद होणे, मोऱ्या वाहून जाणे, संरक्षक भिंती पडणे आदी स्वरूपात रस्त्यांचे नुकसान झालेले आहे.

अतिवृष्टीतील रस्ते तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी १८ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी प्राथमिक अहवालानुसार १०७ कोटी ३५ लाख लागू शकतात. त्याचबरोबर नुकसानग्रस्त रस्त्यांची नवीन माहिती समोर आल्यानंतर निधी आणखी लागणार आहे. रस्ते कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी पाटण तालुक्यात ५१ कोटी २० लागणार आहेत. तर महाबळेश्वर तालुक्यात १९ कोटी ८० लाख, वाई तालुक्यात १४ कोटी ३७ लाख रुपये लागणार आहेत. तर कऱ्हाड तालुक्यात ९ कोटी ८१ लाख, जावळी ४ कोटी ६० लाख आणि सातारा तालुक्यासाठी १ कोटी ८१ लाख रुपये लागणार आहेत.

जिल्हा परिषदेकडील रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. त्यामुळे निधी मिळून रस्ते दुरुस्त होईपर्यंत वाहनधारकांचा प्रवास हा खडतरच राहणार आहे.

चौकट :

तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचा प्रयत्न...

जिल्हा परिषदेकडील मार्ग तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. किमान एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. ३१ जुलैअखेर अतिवृष्टीत सापडलेले रस्ते दुरुस्त करण्याचे नियोजन आहे. तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग समिती सभेत रस्ता दुरुस्तीसाठी आपत्कालीनमधून निधी देण्याचा ठरावही झाला आहे. त्यामुळे काही निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

.......................................................................