शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:38 IST

मसूर : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस गुरूवार, दि. २९ रोजी साजरा होत आहे. यादिवशी कऱ्हाड उत्तर मतदारसंघात पर्यावरणपूरक ...

मसूर : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस गुरूवार, दि. २९ रोजी साजरा होत आहे. यादिवशी कऱ्हाड उत्तर मतदारसंघात पर्यावरणपूरक वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

यामध्ये सकाळी नऊ वाजता रहिमतपूर, नागठाणे, उंब्रज, पुसेसावळी येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. कऱ्हाड तालुक्यामधील हजारमाची, कोर्टी येथे सकाळी साडेदहा वाजता महिला आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. पेरले येथे दुपारी साडेबारा वाजता घनवन (मियावाकी) प्रकल्‍पांतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. रहिमतपूर, धामणेर, हजारमाची, किवळ, खोडजाईवाडी येथे घनवन प्रकल्‍पांतर्गत ३५ गुंठे क्षेत्रावर साडेदहा हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.

नाबार्ड दिल्लीचे माजी अध्यक्ष वाय. एस. पी. थोरात यांचे ‘शेती व सहकार’ या विषयावर दुपारी दोन वाजता मार्गदर्शनपर व्याख्यान व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात येणार आहे. कऱ्हाड उत्तर मतदार संघातील २०५ गावांमध्ये एकाचवेळी ४,१०० लिंबू रोपांचे रोपण केले जाणार आहे. या अनुषंगाने प्रातिनिधीक स्‍वरूपात पिंपरी येथे दुपारी सव्वातीन वाजता ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते साठ लिंबू रोपांचे रोपण करण्यात येणार आहे.

सह्याद्री साखर कारखाना कार्यस्‍थळावर दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातील तेराशे कर्मचाऱ्यांना तैवान वाणाच्या एक किलो वजनाचे फळ देणाऱ्या पेरू रोपाचे वितरणाचा कार्यक्रम खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आणि आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, सुनील माने, शहाजी क्षीरसागर, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, प्रणव ताटे, संगीता साळुंखे, चंद्रकांत जाधव, जितेंद्र पवार, नंदकुमार बटाणे, आनंदा कोरे, डी. बी. मोहिते, आबासाहेब पाटील, संजय रामचंद्र पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहेत.

बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मसूर, हेळगाव, उंब्रज येथे महिला राष्‍ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिला आरोग्‍य शिबिराचे आयोजन केले होते. त्‍याचबरोबर नांदगाव येथे नेत्ररोग निदान शिबिर आयोजित करुन सहाशे रूग्‍णांना मोफत चष्‍म्यांचे वाटप करण्यात आले.

पाटण, वाई, महाबळेश्वर, सातारा, जावळी तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्‍या महापूर व भूस्‍खलनामुळे उद्भवलेल्‍या परिस्थितीचा विचार करून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आपद्ग्रस्‍तांना आर्थिक मदत करण्यात यावी, त्‍या निधीचा विनीयोग शाश्वत व कायमस्‍वरूपीच्या विकासकामांसाठी करण्यात येईल आणि वाढदिवसानिमित्त केक, हार, शाल, श्रीफळ, बुके यासाठी खर्च करू नये, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. (वा. प्र.)