शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळीचा फटका सुरूच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून काहीवेळा अवकाळी पावसाचाही दणका बसत आहे. यामुळे बळिराजात धास्ती असून ...

सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून काहीवेळा अवकाळी पावसाचाही दणका बसत आहे. यामुळे बळिराजात धास्ती असून पिके आणि फळबागांवर औषध फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढत चालला आहे.

जिल्ह्यातील बळिराजा मागील चार-पाच वर्षांपासून सतत निसर्गाशी सामना करत आला आहे. कधी दुष्काळाचा, तर काहीवेळा अतिवृष्टीशी मुकाबला करावा लागतोय. अधूनमधून अवकाळी पाऊसही तडाखा देत आहे. यामुळे सावरुन उभा राहायचे म्हटले तरी पुन्हा आणखी फटका बसतो. जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत तर २५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकरी कसाबसा सावरत असतानाच आता अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण झालेली आहे. गेल्या सहा दिवसांपासून पिकांसाठी खराब वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा, मका अशी पिके घेतली आहेत. या पिकांवर रोग पडण्याची अधिक शक्यता आहे, तर डाळिंब आणि द्राक्षसारख्या बागांवरही रोगाचे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळिराजा कीटकनाशकांची फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

फोटो दि.०८सातारा अ‍ॅग्रो फोटो...

फोटो ओळ : ढगाळ वातावरण तयार होत असल्याने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात कांदा पिकांवर शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करू लागले आहेत.

...................................................