शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पाल यात्रेतील कोट्यावधींची उलाढाल यंदा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST

उंब्रज : पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा दरवर्षी लाखो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र, यंदा ...

उंब्रज : पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा दरवर्षी लाखो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली. परिणामी, गर्दी झाली नाही. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला; पण याचा फटका येथील अर्थकारणाला बसला. यात्रा कालावधीत होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढाल ठप्प झाली.

यात्रा दरवर्षी सर्वत्र मोठ्या उल्हासात साजऱ्या होतात. या पाठीमागे भाविकांची श्रद्धा असते. या श्रद्धेने ते मोठ्या उत्साहात यात्रेत सामील होतात. ज्या ठिकाणी गर्दी होते, मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, त्या ठिकाणी गर्दीच्या सर्व प्रकारच्या गरजा, सेवा पुरवणारे व्यवसाय आपोआप थाटले जातात. त्यामध्ये लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. यात्रा ही त्या परिसरातील अर्थकारणाचे मोठे निमित्त असते.

पाल यात्रेचा विचार केला तर यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यांतून लाखो भाविक येतात. या भाविकांच्या प्रवासाचा खर्चच कोट्यवधी रुपयांचा होतो. यामध्ये एस.टी. महामंडळाच्या गाडीने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या तिकिटातून दरवर्षी महामंडळ लाखो रुपये आर्थिक फायद्यात असते. याचबरोबर या भाविकांच्या जेवणखाण्यावरही लाखो रुपयांची उलाढाल होत असते. फक्त पाल नव्हे तर महामार्गापासून पालपर्यंत येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील हॉटेल, ढाबे या कालावधीत तुडुंब असतात. हे चित्र यंदा दिसले नाही.

पालमधील वाळवंटात खाद्यपदार्थांसह विविध प्रकारची शेकडो दुकाने थाटली जातात. त्यामध्ये टुरिंग टॉकीज, तमाशाचे फडही लागतात. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका दुकानाची आर्थिक उलाढाल लाखाहून अधिक रुपयांची होत असते; तर करमणुकीचे थिएटर कायम हाऊसफुल्ल दिसून येत असल्यामुळे तेथील उलाढालही लाखोंच्या घरात जाते. या यात्रेचे विशेष म्हणजे मिरवणुकीवर पिवळा भंडारा व खोबऱ्याचे तुकडे यांची मोठ्या प्रमाणात उधळण होते. शेकडो पोती भंडारा व खोबरे यांची येथे विक्री होते. हे विक्री करणारे लोक स्थानिक व परिसरातील असतात. त्यांनाही या व्यवसायातून आर्थिक फायदा होत असतो. अशा पद्धतीने किरकोळ व्यवसायातून स्थानिक व परिसरातील व्यावसायिक यांची या यात्रेच्या निमित्ताने आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र, यंदा एक रुपयाचीही उलाढाल येथे झाली नाही.

- चौकट

ग्रामपंचायतीलाही करही नाही !

या शेकडो व्यावसायिकांकडून ग्रामपंचायत प्रशासन कर गोळा करते. त्यातून ग्रामपंचायतीचाही मोठा आर्थिक फायदा होत असतो. असे अर्थचक्र या यात्रेच्या निमित्ताने या परिसरात मोठ्या प्रमाणात फिरत असते. यावर्षी ते पूर्णपणे थांबले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने दक्षता म्हणून यात्रेला बंदी घातली, ती योग्य होतीच; पण कोरोनाने या परिसरात यात्रेनिमित्त होणारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल थांबवली, हे मात्र नक्की.