शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षणासाठी चक्क रस्त्यात लावले झाड

By admin | Updated: April 8, 2015 00:33 IST

खड्डा ठरतोय कर्दनकाळ : वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी सदर बजार येथील नागरिकांचा पुढाकार; उपाययोजनेची मागणी

सातारा : नागरी सुविधांसाठी अनेकवेळा आंदोलने केली जातात. त्यामध्ये रास्ता रोको, मोर्चा, निदर्शन तर कधी रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारापोणही केले जाते. यामुळे अनेकदा आंदोलनकर्त्यांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु येथील समाजकल्याण कार्यालयाजवळ रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून सदर बजार येथील नागरिकांनी एकत्र येवून वाहनधारकांच्या संरक्षणासाठी या खड्ड्यात चक्क झाड उभे केले.सदर बजार येथील समाजकल्याण कार्यालयालगत गेल्या दोन महिन्यांपासून जलवाहिनीला गळती लागली आहे. गळतीमुळे नुकताच डांबरीकरण केलेला रस्ताही उखडला आहे. पाईपलाईनला लागलेल्या सततच्या गळतीमुुळे याठिकाणी रस्त्यावर सुमारे तीन फुुट व्यासाचा व दोन फुट खोलीचा खड्डा पडला आहे. दिवसभर या खड्ड्यातून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे जागोजागी पाण्याची डबकी साचली आहेत. वाहत्या पाण्यामुळे डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता उघडण्याची शक्यता नाकारात येत नाही. दरम्यान जलवाहिनी फुटलेल्या खड्ड्यात दिवसभर पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही. प्रामुुख्याने रात्रीच्या वेळी या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. नुकतेच मध्यरात्री एक महागडे चारचाकी वाहन या खड्ड्यात आदळून दुभाजकाला धडकले होते. त्यामुळे या वाहनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही नुुकसान भरपाई कोणाकडे मागायची? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या समस्येमुळे वाहनधारकांच्या संरक्षणासाठी सदर बजार येथील नागरिकांनी पुढाकार घेवून रस्त्यात पडलेल्या या खड्ड्यात चक्क एक झाड उभे केले. जेणेकरून रात्रीच्या वेळी अपघात होणार नाहीत. रस्त्यात लावलेल्या या झाडामुळे वाहनचालकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी संबंधित विभागाने या बाबीकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)हजारो लीटर पाणी वायागेल्या एक महिन्यापासून या रस्त्यावर जलवाहिनीला गळती लागली आहे. गळतीमुळे रस्ताही उखडला आहे. सदर बजारच्या पूर्व भागात नागरिकांना अजुुनही मुबलक पाणी मिळत नाही. मात्र, या रस्त्यावर दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तरीदेखील संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर बजारकडे जाणारा हा मुख्य मार्ग असून या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे जलवाहिनीची गळती काढने गरजेचे आहे.- विकास धुमाळ, नागरिक