शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:43 IST

विक्रेते फूटपाथवर कऱ्हाड : शहरातील सौंदर्यात भर पडावी म्हणून पालिकेने शहरातील रस्त्यांसह त्याच्या बाजूने आकर्षक पादचारी मार्गाची उभारणी केली. ...

विक्रेते फूटपाथवर

कऱ्हाड : शहरातील सौंदर्यात भर पडावी म्हणून पालिकेने शहरातील रस्त्यांसह त्याच्या बाजूने आकर्षक पादचारी मार्गाची उभारणी केली. त्यामुळे शहरातील नागरिक तसेच प्रवाशांकडून रस्त्यावरून चालण्याऐवजी पादचारी मार्गाचा चांगला वापर केला जाऊ लागला; मात्र आता बांधण्यात आलेल्या या पादचारी मार्गाचा प्रवासी कमी आणि विक्रेतेच जास्त फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.

साइडपट्ट्या खचल्याने वाहतुकीस धोका

नागठाणे : नागठाणेपासून तारळे रस्त्यावर रस्त्याची साइडपट्टी खचली आहे. हा रस्ता अरुंद असल्याने समोरून आल्यानंतर कोणी वाहन खाली घ्यायचे, यावरून त्यांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे साइडपट्टी टाकण्याची मागणी होत आहे. साइडपट्ट्या खचल्या असल्याने दोन मोठी वाहने समोरासमोर आली की कोंडी होते.

अपघातास निमंत्रण

म्हसवड : मोही (ता. माण) येथील शिंगणापूर-म्हसवड मार्गावरील स्मशानभूमी शेजारी असणाऱ्या नागमोडी वळणाला झुडपांनी वेढा दिला आहे. त्यामुळे बऱ्याचदा समोरून येणारे वाहन चालकांच्या नजरेस पडत नाही. परिणामी या धोकादायक वळणावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

खड्ड्यांचा जाच थांबेना

सातारा : सातारा-कोरेगाव मार्गावरील अजंठा चौकात असणारा भला मोठा खड्डा वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. रात्रीच्या वेळी हा खड्डा दिसत नसल्याने वाहनधारकांची फसगत होत असून, अपघात होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या ‘जैथे थे’ आहे. हा खड्डा बुजविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

रिफ्लेक्टरची मागणी

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होतो. रिफ्लेक्टर नसल्यामुळे दिवसेंदिवस महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर तत्काळ रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.

पोलिसांची कमतरता

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी जागोजागी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक तसेच वाहनचालकांमधून होत आहे.