शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलींच्या शिक्षणाचा घेतला वसा- दत्तात्रय सावंत यांनी २५ वर्षांत शिकवली १३० मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 19:04 IST

दत्तात्रय सावंत यांना २५ वर्षांपूर्वी एकुलता एक मुलगा अकाली सोडून गेला. त्यानंतर समाजातील अनाथ, गरीब विशेषत: मुलींना शिकवून त्यांना ताठ मानेने स्वत:च्या पायावर उभे करण्याचा वसा घेतला.

ठळक मुद्दे मजुराची ही कहाणी ।

पांडुरंग भिलारे ।वाई : धकाधकीच्या गतिमान युगात सर्वजण व्यावहारिक विचार करताना दिसत आहेत. सामाजातील तसेच रक्ताच्या नात्यातील माणुसकी लोप पावत असताना दत्तात्रय सावंत यांच्यासारखी देवदूत माणसं याला अपवाद ठरत आहेत़ त्यांनी २५ वर्षांत तब्बल १३० अनाथ, गरीब मुलांना शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले.

दत्तात्रय सावंत यांना २५ वर्षांपूर्वी एकुलता एक मुलगा अकाली सोडून गेला. त्यानंतर समाजातील अनाथ, गरीब विशेषत: मुलींना शिकवून त्यांना ताठ मानेने स्वत:च्या पायावर उभे करण्याचा वसा घेतला. स्वत: अल्पशिक्षित व शेतीही नसल्याने सेंट्रिंगची कामे करून या मुलांचे राहणे व शिक्षणाचा खर्च करत असतात. या कामात त्यांच्या पत्नी मालन यांनीही समर्थ साथ दिली. सर्व मुलांमध्ये काकी या नावाने परिचित होत्या; पण दोन वर्षांपूर्वी त्यांचाही मृत्यू झाला़ आत्ता मुलांची आई आणि वडील म्हणून तेच जबाबदाऱ्या पार पाडू लागले. त्यांच्याकडे सातारा, पुणे, लातूर, नांदेड, जळगाव, ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी येत आहेत़ आताही त्यांच्याकडे ३२ मुली असून, आठ ते दहा मुली त्यांच्या घरी वास्तव्यास आहेत. बाकीच्या कोल्हापूर, कºहाड व वारणानगरला शिक्षण घेत आहेत़तीन मुली वकील तर पाच मुली डॉक्टरदत्तात्रय सावंत यांनी तीन मुलींना वकील केले, पाचजणींना डॉक्टर बनविले आहे. बारा प्राध्यापिका, आठ प्राथमिक शिक्षिका, साठ मुली विविध शाखेतून इंजिनिअर केले तसेच अनेकांना पदवीधर केले आहे़ हे सर्व करीत असताना त्यांनी विविध बँका, पतसंस्थांमधून अनेकदा कर्ज काढले. एक स्वत:च्या मालकीचा बंगला विकला; पण मुलींच्या शिक्षणात बाधा येऊन दिली नाही़ त्यांनी आतापर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्यापैकी २२ मुलींचे कन्यादान करून दिले आहे़ २१ मुलींनी कर्माने बाप असणाºया बापूंचे नाव वडील म्हणून लावले असल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार मिळाले आहेत.

दत्तात्रय सावंत यांचे अनाथ, गरीब मुली, मुले यांना सहारा देऊन शिक्षण देऊन सक्षम करण्याचे कार्य २५ वर्षे सुरू आहे. आम्ही नवप्रकाश मंडळातर्फे त्यांच्या विधायक कार्यास सहकार्य केले आहे.- विनोद सकुंडे, गंगापुरी, वाई

चंद्रकांत जाधव हा एकमेव मुलगा पीएचडी करण्यासाठी अमेरिकेला जात आहे. त्याला राज्य शासनाची स्कॉलरशीप मिळाली. त्यांना पाठविण्यासाठी लागणारा साडेतीन लाख खर्च गोळा करत आहे.- दत्तात्रय सावंत, सातारा 

टॅग्स :SchoolशाळाSocialसामाजिक