शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांवर राजकीय मेहर

By admin | Updated: February 4, 2015 23:55 IST

महाबळेश्वरमध्ये उदयनराजे : बेसुमार वृक्षतोडप्रकरणी रामराजेंना जबाबदार धरले

महाबळेश्वर : ‘महाबळेश्वर-पाचगणीसाठी राज्य आणि केंद्र शासनाने विविध समितींची नियुक्ती करूनही बेसुमार वृक्षतोड व अनधिकृत बांधकामे राजकीय आश्रयानेच सुरू आहेत. तत्कालीन राजकीय नेतृत्व आणि माजी पालकमंत्र्यांची मेहर नजरेखालीच ही बेकायदेशीर कृत्ये घडली आहेत,’ असा ठाम आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. दरम्यान, रामराजे नाईक-निंबाळकर यांचा उल्लेख न करता हा आरोप केला.महाबळेश्वर येथील पाहणी दौरा केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. खासदार उदयनराजे म्हणाले,‘महाबळेश्वर-पाचगणीसाठी विविध समित्या कार्यरत आहेत. त्या समितींवर स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार, आमदारांना स्थान न दिल्यामुळे जनतेच्या अपेक्षा व अडचणी समितीने कधीच जाणून घेतलेल्या नाहीत. उच्चस्तरीय सनियंत्रण समिती, व्याघ्र प्रकल्प, पश्चिम घाट विकास, बफर्स झोन, हेरिटेज अशा अनेक समित्यांनी जनहित लक्षात न घेता बरेच निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा व मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. विकासकामात मात्र, अडचणी निर्माण झाल्या आहेत. देशातील हा भाग आगळा-वेगळा असून, येथे कायदे वेगळेच निर्माण केले आहेत.इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये वृक्षतोड करण्यास मनाई आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी आवश्यक असल्याचा निर्णय समितीने घेतला. तेथे पारदर्शकता नाही.जिल्हाधिकारी कोणत्या निकषावर वृक्षतोडीची परवानगी देतात, किती झाडांसाठी याची कल्पना कोणालाही येत नाही. त्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. शासकीय आश्रय व प्रशासकीय उदासीनता बेकायदेशीर कामास जबाबदार आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार उदयनराजे म्हणाले, ‘वृक्षतोडी संदर्भातील कायद्याचे ज्ञान वन विभागास असणे अपेक्षित आहे. मात्र, असे कधीच घडत नाही, हे दुर्दैव आहे. पाचगणी व महाबळेश्वर परिसरात झालेल्या वृक्षतोडीच्या व अनधिकृत बांधकामाबद्दल सत्य माहिती नियोजन मंडळाकडून व्यवस्थित मिळू शकत नाही. भरमसाठ वृक्षतोड होऊनही कारवाईबाबत महाबळेश्वरात केवळ सहा तर पाचगणीत एकही तक्रार दाखल झालेली नाही. महाबळेश्वर एकूण ९१ तर पाचगणीत ८४ अनधिृकत बांधकामे आहेत. एकावरही अद्याप कारवाई झालेली नाही. यामागे राजकीय अर्थकारण असण्याची दाट शक्यता आहे. तत्कालीन लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.’ (प्रतिनिधी)बड्या हॉटेलचे दिले उदाहरण...स्वत:स मोठे राजकीय प्रस्थ समजल्या जाणाऱ्या तत्कालीन पालकमंत्री, आजी-माजी आमदार माझ्या कामाच्या पद्धतीवर टीका करतात. त्यांनी अतिरिक्त पालकमंत्र्यांची उपमा देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या कारकिर्दीत महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या एका बड्या हॉटलेचे उदाहरण दिले. बांधकाम परवानगी नसताना तसेच बांधकाम विभागाचे रस्त्याबाबतचे नियम डावलले आहेत. हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई का नाही, हे संरक्षण साधेसुधे नाही तर तत्कालीन मंत्री व राजकीय नेत्यांचे आहे, असे माझे ठाम मत आहे. संबंधितांस संरक्षण देणाऱ्या मंत्री, आमदारांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी खासदार उदयनराजे यांनी केली.