शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

शाळा भरल्या अन् एस. टी.ची चाकं खेड्यांकडे धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST

सातारा : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ...

सातारा : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने एस. टी.च्या फेऱ्या ग्रामीण भागात वाढविल्या आहेत. यामुळे अनेक भागात कित्येक दिवसांनंतर एस. टी.ची चाके धावली आहेत. त्याचप्रमाणे मागणीनुसार फेऱ्या वाढविण्याबाबत आगार व्यवस्थापनाला सूचना केल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात मार्च २०२०मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर राज्य शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. पर्यायाने मुले घरातच बसून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत होती.

दरम्यान, एस. टी.ची चाके थांबली होती. ती सुरू करण्यात आली. मात्र, शाळा, महाविद्यालये बंद असल्याने उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक आगारांमधून लांब पल्ल्याच्या जादा गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. आता शाळा सुरू झाल्या आहेत. राज्य शासनाने २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या. मात्र, खासगी इंग्लिश मीडियमच्या बहुतांश शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एस. टी. महामंडळाने शहरी भागातून ग्रामीण फेऱ्या वाढविल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होत आहे. मात्र, असंख्य पालकांनी अद्याप संमत्ती पत्र दिलेले नसल्याने गाड्यांना फारशी गर्दी दिसत नाही.

चौकट

००००

जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळांची संख्या

२३७४

विद्यार्थी संख्या

७२८४७

पाचवी ते आठवी

००००

नववी ते बारावी

------------

पास योजनेचा लाभ घ्यावा

राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात पाचवी ते बारावी वर्ग सुरू झाले आहेत. त्याची दखल घेऊन एस. टी. महामंडळानेही गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. मागणीनुसार आणखी गाड्या सोडण्यात येणार आहेत. याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पासचा वापर केलेला नाही. ही संख्याही वाढणे गरजेचे आहे.

- ज्योती गायकवाड,

विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा.

००००००००

सातारारोडला साताऱ्यातून पहाटे गाडी सोडण्याची गरज

अनेक शिक्षक साताऱ्यातून ग्रामीण भागात शाळेत शिकवण्यासाठी जातात. त्यांना आता लवकरच नोकरीच्या ठिकाणी जावे लागते. त्याचप्रमाणे दुर्गम भागातील शिक्षकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून सातारारोड त्याचप्रमाणे इतर भागात गाड्यांची फेरी सुरू करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून केली जात आहे.

०००००००

चौकट

विद्यार्थी म्हणतात...!

आम्हाला शाळेला कधी जाऊ असे झाले होते. आता एस. टी.ही सुरू झाली आहे. त्यामुळे चांगलीच सोय होणार आहे. पण शाळा पूर्ण वेळ भरत नाही. ती लवकर सुटत असल्याने गावी जाताना बराच वेळ वाट पाहावी लागते.

- अर्थव पाटील, फलटण.

----

शाळा सुरू झाल्यामुळे एस. टी.ही सुरू झाली. मी एस. टी.नेच शाळेला जातो. पण आमच्या अनेक मित्रांचे आई-वडील त्यांना एस. टी.ने पाठवत नाहीत. त्यांना कोरोनामुळे संसर्ग वाढण्याची भीती वाढत असावी.

- सागर गडकरी

विद्यार्थी, मेढा.

०००००००००

कोरोनाआधी २३०० फेऱ्या होत्या धावत

कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक भागात अगदी दुर्गम पाटण, महाबळेश्वर, जावळी खोऱ्यातही एस. टी. पोहोचली होती. त्या काळात दररोज सरासरी २३०० फेऱ्या होत होत्या. आता मात्र कमालीची घट झाली आहे. सध्या सरासरी अठराशे फेऱ्या सुरू आहेत. मात्र, शाळा आता कोठे सुरू झाल्या आहेत. काही दिवसांनंतर चित्र नक्कीच बदललेले असले.

०४एसटी

०४स्टुडंट