शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

सातारी ज्येष्ठ नागरिक स्वत:ला ठेवताहेत गुंतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 1:09 AM

वृद्धत्व प्रत्येकालाच येणार आहे. ज्येष्ठांचा मान राखणं आपली संस्कृती आहे. ती नव्या पिढीने जपली, त्यांचा आदर केला तर ज्येष्ठांचं जगणंही सोपं जाईल. - प्रा. डॉ. शामला माने, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा.

ठळक मुद्दे चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद संशोधनातून निष्पन्न । कौटुंबिक कलह कमी

जगदीश कोष्टी।सातारा : ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाची खाण असल्यानं भावी पिढीला उपयोगच व्हायला हवा. पण बदलत्या जीवनपद्धतीमुळे हेच ज्येष्ठ नागरिक अडगळीचे वाटू लागले आहेत. त्यातून कौटुंबिक कलह वाढत असतात. समाजाला भेडसावणाऱ्या जिवंत समस्येवर छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ. शामला माने यांनी संशोधन केले. अन् त्यातून असे लक्षात आले की साता-यातील बहुतांश ज्येष्ठ नागरिक स्वत:ला गुंतून ठेवत असल्याने ते कुटुंबालाही धरून आहेत. या संशोधनात आलेले अनुभव ‘लोकमत’ वाचकांसाठी...

प्रश्न : ज्येष्ठ नागरिकांवर संशोधन करावे, असे आपणास का वाटले?उत्तर : लहानपणापासून ज्येष्ठांना जवळून पाहत आले आहे. त्याचवेळी समाजात अनेक ज्येष्ठ नागरिक कौटुंबिक, सामाजिक समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळे उरलं-सुरलं आयुष्यही नीट जगता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अभ्यास करण्याचा संकल्प केला.

प्रश्न : या विषयावर किती वर्षे संशोधन केले. स्वरूप कसे होते.उत्तर : सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा समाजशास्त्रीय अभ्यास हा विषय संशोधनासाठी घेतला. त्यासाठी २००५ पासून तयारी करत होते. साताºयातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकींना जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रश्नावली भरून घेतली.

प्रश्न : निष्कर्ष काय निघाला?उत्तर : हे संशोधन करताना असा निष्कर्ष निघाला की, साताºयातील ज्येष्ठ नागरिक सुशिक्षित अन् सधन आहेत. त्यामुळे ते ज्येष्ठ नागरिक संघात जातात. विविध सामाजिक उपक्रम, व्याख्याने, सहलींमध्ये गुंतून ठेवतात. त्यांनी स्वत:ला कुटुंबामध्ये सामावून घेतले आहे. त्यामुळे कुटुंबात वादाचे फारसे प्रसंग येत नाहीत. काही ज्येष्ठ नागरिक मुलांपासून वेगळे राहत असले तरी ते त्यांच्या नजरेसमोर आहेत. सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष निघाला तो ज्यांच्याकडे पैसा, संपत्ती आहे, त्यांना कुटुंबातून फारसा त्रास होत नाही. तसेच ज्येष्ठांनीही सतत तरुण पिढीच्या राहणीमानाबाबत मतप्रदर्शन करू नये. ज्येष्ठ नागरिक आणि नव्या पिढीने एकमेकांना सामावून घेतले तर कलह टळण्यास मदत होणार आहे.

 

  • संपत्ती स्वत:कडेच ठेवून मृत्यूपत्र करावे

संशोधनातून असे लक्षात आले की, पैसा, संपत्ती ज्या ज्येष्ठांकडे आहे. त्यांना कुटुंबातून फारसा त्रास होत नाही. आजारपण, औषधे, दैनंदिन गरजा, नातवांचे लाड करण्यासाठी कोणाकडे हात पसरावे लागत नाहीत. अगदी झोपून असू तेव्हा सेवा कोणी नाही केली तरी आपण एखादी परिचारिका नेमू शकतो. संपत्तीचा प्रश्न येतो तेव्हा अंतिम निर्णय म्हणून मृत्यूपत्र तयार करून त्याचे नियोजन करावे.

  • वृद्धाश्रमात बाहेरचे ज्येष्ठ अधिक

सातारा शहर परिसरात पाच-सहा वृद्धाश्रम आहेत. या वृद्धांश्रमांचाही प्रा. डॉ. शामला माने यांनी अभ्यास केला. यामध्ये असे लक्षात आले की, या ठिकाणी साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत बाहेर ज्येष्ठ नागरिकांची संख्याच जास्त आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालय