शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

सातारा : तळहिरा तलावातून पाण्याची राजरोस चोरी, पाणीसाठा खालावला : तीन गावांत पाणी टंचाईचे सावट; इलेक्ट्रिक मोटारीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 13:14 IST

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या तळहिरा पाझर तलावातून इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा खालावत असून, तीन गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. लवकर लक्ष न दिल्यास भविष्यात या भागाला पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

ठळक मुद्देपाणीसाठा खालावत असून, तीन गावांवर पाणीटंचाईचे सावट लक्ष न दिल्यास भविष्यात पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय पर्याय नाहीइलेक्ट्रिक मोटारी टाकून दिवस-रात्र तलावातील पाणी चोरण्याचा धक्कादायक प्रकार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या तळहिरा पाझर तलावातून इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा खालावत असून, तीन गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. लवकर लक्ष न दिल्यास भविष्यात या भागाला पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.यावर्षी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे तळहिरा तलावात कमी पाणीसाठा झाला. परिणामी या तलावावर अवलंबून असलेल्या अनेक गावांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे.

कारण असलेला पाणीसाठा टिकला तरच उन्हाळ्यातील काही महिने या परिसरातील गावांची तहान भागणार आहे. मात्र, सध्या दिवस-रात्र या तलावातील पाणी इलेक्ट्रिक मोटारी टाकून चोरण्याचा धक्कादायक प्रकार राजरोसपणे सुरू आहे. हे पाणी दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे.

वाठार स्टेशन, तळिये व देऊर या प्रमुख तीन गावांची तहान भागवणारा हा तळहिरा तलाव आहे. गेल्या पाच वर्षांत पूर्ण क्षमतेने कधीच भरला नाही. चालू वर्षीही जिल्ह्यातील सर्वच मोठी धरणे, पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले असताना तळहिरा तलावात मात्र केवळ ३० टक्के एवढाच पाणीसाठा झाला आहे.

यातून देऊरमधील हंगामी शेती तसेच परवानाधारक शेतकरी यांच्यासाठी या पाणी सोडले गेले तर या तलावात पाणीच शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या या तलावात परवानाधारक शेतकºयांशिवाय अनेक बिनापरवाना मोटारीद्वारे या तलावातील पाणी शेतीसाठी वापरले जात आहे.देऊर व तळिये गावात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या तलावात गेल्या त्यांच्यासाठी या तलावातून पाणी देण्याची व्यवस्था असल्याने शेतीसाठी हे पाणी हे शेतकरी वापरत आहेत; परंतु असणाऱ्या परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी चोरी होत असल्याने या तलावातील पाणी रातोरात कमी होऊ लागले आहे. याला संबंधित पाटबंधारे विभागाने आळा घातला नाही तर असणारा पाणीसाठा अगदी काही दिवसांतच संपुष्टात येईल, अशी परिस्थिती आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी