शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

सातारा : ग्रामपंचायत उमेदवारांचा मान....शेवटच्या दिवशी सर्व्हरवर ताण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:24 IST

निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज  भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते.

ठळक मुद्देसातारा : ग्रामपंचायत उमेदवारांचा मान....शेवटच्या दिवशी सर्व्हरवर ताण!निवडणूक : अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घातली उमेदवारांना साद

सातारा : निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज  भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते. या पार्श्वभूमीवर ऐनवेळी धावाधाव नको...सगळेच दमतात, उमेदवारी अर्ज दाखल करा..., अशी साद जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना घातली आहे.जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी ५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याचे कामकाज सुरु झाले आहे. जिल्हा आकाराने मोठा आहे. जिल्ह्यात १४९६ ग्रामपंचायती आहेत. साहजिकच राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होतो. त्यात सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा समावेश नेहमीच असतो.

मागील टप्प्यात मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. आॅनलाईन पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारांनी तहसीलदारांकडे आॅनलाईन अर्जाची प्रिंट व कागदपत्रे द्यावयाची असतात. मात्र ऐनवेळी अर्ज दाखल करुन घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी तसेच तहसीलदारांकडे अर्ज दाखलकरण्याची गडबड सुरु केल्याने प्रशासनाची भलतीच पळापळ झाली.अनेकदा शासनाच्या सर्व्हरवरही बंद पडतो. तेव्हा उमेदवारांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासकीय यंत्रणेवरही ताण येत असतो. सातारा जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र अद्यापही अर्ज भरण्याबाबत उमेदवारांचा अल्प प्रतिसाद मिळतो आहे. दोन दिवस झाले आहेत.उमेदवार ऐनवेळी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी गडबड करणार, हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वेळेत येऊन उमेदवारी अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. महसूल उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना हे आवाहन करण्याबाबत लेखी सूचना केली आहे.४८ सरपंच व ३८२ सदस्यपदांसाठी ही निवडणूक होणार आहे. ६ सप्टेंबरअखेर सरपंचपदासाठी अवघे ५ आणि सदस्यपदासाठी अवघे १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. स्थानिक राजकारणात रस असणारे उमेदवार प्रतिस्पर्ध्यांचा अंदाज घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करत असतात. काही मंडळी नेत्यांचे आदेश येण्याची वाट पाहत असतात.

आदेश होताच मग कागदपत्रांची जुळवाजुळव करुन अर्ज दाखल करण्याची धावाधाव सुरु होते. अनेकांना ऐनवेळी दाखले मिळत नाहीत, त्यामुळे उमेदवारी अर्जही भरता येत नाहीत. हे नुकसान टाळण्यासाठी उमेदवारांनी वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. ५ सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे. ११ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल केले गेल्यास संपूर्ण यंत्रणेवर ताण येतो. हे लक्षात घेऊन वेळ आहे तर उमेदवारांनी वाट न पाहत बसता अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.- अविनाश शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकSatara areaसातारा परिसर