शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

सातारा : ग्रामपंचायत उमेदवारांचा मान....शेवटच्या दिवशी सर्व्हरवर ताण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:24 IST

निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज  भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते.

ठळक मुद्देसातारा : ग्रामपंचायत उमेदवारांचा मान....शेवटच्या दिवशी सर्व्हरवर ताण!निवडणूक : अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घातली उमेदवारांना साद

सातारा : निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज  भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते. या पार्श्वभूमीवर ऐनवेळी धावाधाव नको...सगळेच दमतात, उमेदवारी अर्ज दाखल करा..., अशी साद जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना घातली आहे.जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी ५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याचे कामकाज सुरु झाले आहे. जिल्हा आकाराने मोठा आहे. जिल्ह्यात १४९६ ग्रामपंचायती आहेत. साहजिकच राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होतो. त्यात सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा समावेश नेहमीच असतो.

मागील टप्प्यात मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. आॅनलाईन पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारांनी तहसीलदारांकडे आॅनलाईन अर्जाची प्रिंट व कागदपत्रे द्यावयाची असतात. मात्र ऐनवेळी अर्ज दाखल करुन घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी तसेच तहसीलदारांकडे अर्ज दाखलकरण्याची गडबड सुरु केल्याने प्रशासनाची भलतीच पळापळ झाली.अनेकदा शासनाच्या सर्व्हरवरही बंद पडतो. तेव्हा उमेदवारांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासकीय यंत्रणेवरही ताण येत असतो. सातारा जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र अद्यापही अर्ज भरण्याबाबत उमेदवारांचा अल्प प्रतिसाद मिळतो आहे. दोन दिवस झाले आहेत.उमेदवार ऐनवेळी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी गडबड करणार, हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वेळेत येऊन उमेदवारी अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. महसूल उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना हे आवाहन करण्याबाबत लेखी सूचना केली आहे.४८ सरपंच व ३८२ सदस्यपदांसाठी ही निवडणूक होणार आहे. ६ सप्टेंबरअखेर सरपंचपदासाठी अवघे ५ आणि सदस्यपदासाठी अवघे १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. स्थानिक राजकारणात रस असणारे उमेदवार प्रतिस्पर्ध्यांचा अंदाज घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करत असतात. काही मंडळी नेत्यांचे आदेश येण्याची वाट पाहत असतात.

आदेश होताच मग कागदपत्रांची जुळवाजुळव करुन अर्ज दाखल करण्याची धावाधाव सुरु होते. अनेकांना ऐनवेळी दाखले मिळत नाहीत, त्यामुळे उमेदवारी अर्जही भरता येत नाहीत. हे नुकसान टाळण्यासाठी उमेदवारांनी वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. ५ सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे. ११ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल केले गेल्यास संपूर्ण यंत्रणेवर ताण येतो. हे लक्षात घेऊन वेळ आहे तर उमेदवारांनी वाट न पाहत बसता अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.- अविनाश शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकSatara areaसातारा परिसर