शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : ग्रामपंचायत उमेदवारांचा मान....शेवटच्या दिवशी सर्व्हरवर ताण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:24 IST

निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज  भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते.

ठळक मुद्देसातारा : ग्रामपंचायत उमेदवारांचा मान....शेवटच्या दिवशी सर्व्हरवर ताण!निवडणूक : अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घातली उमेदवारांना साद

सातारा : निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज  भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते. या पार्श्वभूमीवर ऐनवेळी धावाधाव नको...सगळेच दमतात, उमेदवारी अर्ज दाखल करा..., अशी साद जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना घातली आहे.जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी ५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याचे कामकाज सुरु झाले आहे. जिल्हा आकाराने मोठा आहे. जिल्ह्यात १४९६ ग्रामपंचायती आहेत. साहजिकच राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होतो. त्यात सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा समावेश नेहमीच असतो.

मागील टप्प्यात मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. आॅनलाईन पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारांनी तहसीलदारांकडे आॅनलाईन अर्जाची प्रिंट व कागदपत्रे द्यावयाची असतात. मात्र ऐनवेळी अर्ज दाखल करुन घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी तसेच तहसीलदारांकडे अर्ज दाखलकरण्याची गडबड सुरु केल्याने प्रशासनाची भलतीच पळापळ झाली.अनेकदा शासनाच्या सर्व्हरवरही बंद पडतो. तेव्हा उमेदवारांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासकीय यंत्रणेवरही ताण येत असतो. सातारा जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र अद्यापही अर्ज भरण्याबाबत उमेदवारांचा अल्प प्रतिसाद मिळतो आहे. दोन दिवस झाले आहेत.उमेदवार ऐनवेळी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी गडबड करणार, हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वेळेत येऊन उमेदवारी अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. महसूल उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना हे आवाहन करण्याबाबत लेखी सूचना केली आहे.४८ सरपंच व ३८२ सदस्यपदांसाठी ही निवडणूक होणार आहे. ६ सप्टेंबरअखेर सरपंचपदासाठी अवघे ५ आणि सदस्यपदासाठी अवघे १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. स्थानिक राजकारणात रस असणारे उमेदवार प्रतिस्पर्ध्यांचा अंदाज घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करत असतात. काही मंडळी नेत्यांचे आदेश येण्याची वाट पाहत असतात.

आदेश होताच मग कागदपत्रांची जुळवाजुळव करुन अर्ज दाखल करण्याची धावाधाव सुरु होते. अनेकांना ऐनवेळी दाखले मिळत नाहीत, त्यामुळे उमेदवारी अर्जही भरता येत नाहीत. हे नुकसान टाळण्यासाठी उमेदवारांनी वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. ५ सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे. ११ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल केले गेल्यास संपूर्ण यंत्रणेवर ताण येतो. हे लक्षात घेऊन वेळ आहे तर उमेदवारांनी वाट न पाहत बसता अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.- अविनाश शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकSatara areaसातारा परिसर