शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी.कडून मनुष्य ते माल वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST

- जगदीश कोष्टी सातारा जिल्ह्यात भौगोलिक विविधता अनुभवायला मिळते. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांचा भाग सपाट असल्याने एस. टी. ...

- जगदीश कोष्टी

सातारा जिल्ह्यात भौगोलिक विविधता अनुभवायला मिळते. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांचा भाग सपाट असल्याने एस. टी. धावत होती. पण त्याचवेळी सातारा जिल्ह्यातून सह्याद्रीच्या डोंगररांगा गेल्या आहेत. पाटण, परळी, बामणोली, महाबळेश्वर तालुक्यासह जावळी खोऱ्यात दुर्गम गावं आहेत. अनेक ठिकाणी जाण्यासाठी धड रस्ताही नाही. अशा भागातही गावं एस. टी. महामंडळाने संपर्काच्या दृष्टीकोनातून जोडली होती. ज्या भागातून एस. टी. वाहतूक करणे अवघड आहे. अवघड वळणामुळे गाडी जात नव्हती. त्याचप्रमाणे गावे छोटी असल्याने प्रवासी कमी मिळत होते. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी एस. टी. महामंडळाने ताफ्यात मिनी गाड्या आणल्या होत्या. त्यामुळे दुर्गम भागात एस. टी.नं वाहतुकीचं जाळं विणलं होतं. विविध सुविधांमुळे एस. टी. महामंडळ पूर्णपणे फायद्यात चालले होते.

काही दशकांपूर्वी एस. टी. महामंडळ तोट्यात असल्याच्या वावड्या उडत होत्या. तरीही त्यातून बाहेर काढण्यासाठी सातारा विभागातील प्रत्येक विभाग नियंत्रकांनी विविध प्रयोग केले आहेत. सातारकरांची पुणे, मुंबईशी चांगली नाळ जुळली आहे. जिल्ह्यातील हजारो तरुण रोजगारासाठी मुंबईत गेले. तेथे जाऊन माथाडी कामगार म्हणून काम करत आहेत. त्याचप्रमाणे नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने ते पुणे-मुंबईत गेले आहेत. त्यामुळे सातारकरांची या दोन शहरांशी नाळ जोडली गेली आहे. दररोज हजारो प्रवासी पुणे-मुंबईला जात असतात. हेच ओळखून तत्कालीन विभागीय वाहतूक अधिकारी प्रतापसिंह सावंत यांनी सातारा - स्वारगेट, सातारा - मुंबई, सातारा - बोरिवली या विनाथांबा गाड्या सुरू केल्या. त्यामुळे हा विभाग आजही उत्पन्न मिळवून देणारी सोन्याची कोंबडी ठरत आहे.

यात्रा, जत्रा, सणवार अगदी पर्यटन हंगामात जादा वाहतूक करुन दररोज कोट्यवधींचा भरणा राज्य शासनाच्या तिजोरीत होत होता. अशातच मार्च २०२०मध्ये राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला. मुंबईत रुग्ण वाढू लागले. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू नये, यासाठी राज्य शासनाला काही कटू निर्णय घ्यावे लागले. त्यातीलच एक म्हणजे सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करावी लागली. या निर्णयामुळे एस. टी.ला ‘ब्रेक’ लागला. पण दुसरीकडे कोरोनामुळे संचारबंदी केल्याने कोणीही बाहेर पडण्यास धजावत नव्हते. त्यामुळे एस. टी.ची वाहतूक थांबली. उत्पन्न पूर्णपणे थांबले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार करणेही एस. टी.ला अवघड होऊ लागले. चार महिने पगार थांबल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती.

महामंडळाला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सवलत मूल्याची थकीत रक्कम, भविष्यात देय होणारी सवलत मूल्याची रक्कम महामंडळाला देऊन तात्पुरती उपाययोजना केली. दररोज २३ कोटींचे उत्पन्न आणणाऱ्या एस. टी.ला ही तुटपुंजी मदत होती. परंतु, महामंडळ डगमगले नाही. कोरोना महामारीमध्ये आपल्या जीवावर उदार होऊन कर्मचाऱ्यांनी परप्रांतीय मजुरांना, परराज्यातील विद्यार्थी यांना त्यांच्या राज्यात सोडण्याचे व आणण्याचे काम केले. एस. टी. आणि रेल्वे या दोन्हीतून जागा मिळेल, तसे परप्रांतीय मायभूमीत परतण्यासाठी धडपडत होते. साताऱ्याची लालपरी चक्क पश्चिम बंगालच्या सीमेपर्यंत धावली. सर्वाधिक ४ हजार ६०० किलोमीटरचं हे अंतर अवघ्या पाच दिवसात पूर्ण करून साताऱ्याचं नाव देशात गाजविण्याचा पराक्रम सातारा आगाराच्या सुरेश जगताप आणि संतोष निंबाळकर या दोन चालकांनी केला आहे.