शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या पाटांकडं पाण्यानं फिरविली पाठ

By admin | Updated: May 7, 2015 00:20 IST

खटाव तालुक्यात टाहो : प्रादेशिक पाणीयोजना सुरू करण्याबरोबरच तलावात पाणी सोडण्याची मागणी

राजीव पिसाळ -पुसेसावळी व परिसरात पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. पारगाव तलाव कोरडा पडला आहे. उरमोडीच्या पाटांना पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पुसेसावळी व आठ गावची प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
परिसरात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासली की पुसेसावळी व आठ गावची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना जलसंजीवनी ठरते. सन २००३-०४ पासून टंचाईच्या काळात या योजनेतून संपूर्ण खटाव तालुक्याला पाणीपुवठा करण्यात येत होता. एप्रिल २०१२ ते सप्टेंबर २०१३ या अठरा महिन्यांच्या कालावधीत ही योजना मोठ्या प्रमाणावर सुरू होती. सध्या परिसरातील विहिरीतील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली आहे.
टँकर सुरु करण्याची मागणी
पुसेसावळी व थोरवेवाडी येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच पुसेसावळी व आठ गावची नळ पाणीपुवठा योजना सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. खटाव तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या भागात पावसाचे प्रमाण कमी असते. त्यातच सध्याचा उन्हाळा हा भयानक असून शिवारं करपून गेली आहेत. रखरखीत उन्हात फिरवून जनावरांच्या पोटाची खळगी भरावी लागत आहेत. कुसळं खाऊन अर्धपोटी जनावरं गोठ्यात बांधावी लागत आहेत. त्यातच पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्यामुळे जनावरांसह माणसांचेही घशाला कोरड पडू लागली आहे. पावसाळा सुरू व्हायला अजून
एक महिन्याचा कालावधी आहे. मे महिन्यातील कडक उन्हाचा सामना कसा करावा, या प्रश्नाने
येथील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.


तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याची आठवण
पुसेसावळी व आठ गावची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही पुसेसावळी, राजाचे कुर्ले, गोरेगाव वांगी, वांझोळी, भूषणगड, जयरामस्वामींचे वडगाव, वडी, चोराडे, शिरसवडी या गावांकरिता करण्यात आली होती.मात्र, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली तरच या योजनेची आठवण होते. इतर कालावधीत ही योजना बंद असल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणावर देखभाल दुरुस्तीचा भार प्रशासनाला उचलावा लागतो.


पारगाव तलावात पाणी सोडावे
ही योजना कायमस्वरूपी सुरु व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच शेतीच्या पाण्यासाठी पारगाव तलावात पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. ही योजना कायमस्वरूपी सुरु व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच शेतीच्या पाण्यासाठी पारगाव तलावात पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.