शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेला ५१, नवजा ५६ आणि महाबळेश्वरला ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेला ५१, नवजा ५६ आणि महाबळेश्वरला सर्वाधिक ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर कायम असून, त्यामूधन ३१,१६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला होता. पूर्व भागापेक्षा पश्चिमेकडे जोर अधिक होता. कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर या भागात तर बुधवारपासून शुक्रवारपर्यंत धुवाँधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे नदी, नाले एक झाले. कृष्णा, वेण्णा, कोयनासह पश्चिम भागातील अन्य नद्यांना महापूर आला. त्याचबरोबर कोयना, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम, बलकवडी या प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाणी वाढण्याचा विक्रम झाला. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होत गेला. मागील तीन दिवसात जेमतेम पाऊस झाला. असे असतानाच पश्चिम भागात सध्या पावसाचा जोर हळूहळू वाढत चालला आहे.

बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ५१ तर १ जूनपासून २,९६४ मिलिमीटर पाऊस झाला. नवजाला सकाळपर्यंत ५६ व यावर्षी आतापर्यंत ३,८०० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरला ९९ आणि जून महिन्यापासून ३,८३५ मिलिमीटर पाऊस झाला. सकाळी आठच्या सुमारास कोयना धरणात ३२,२६६ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती तर धरणात ९०.८८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. त्याचबरोबर चार दिवसांपासून धरणाचे सहा दरवाजे साडेपाच फुटांवर स्थिर आहेत. दरवाजातून ३१,१६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. कोयनेतून सर्व मिळून ३३,२६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. हे सर्व पाणी कोयना नदीत जात असल्यामुळे कोयनेला पूर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

.......

चौकट :

प्रमुख धरणांतील विसर्ग (सकाळी आठची आकडेवारी)

धोम धरणातून २,१७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. तर कण्हेर २,३७६ क्युसेक, कोयना ३३,२६६, उरमोडीतून १,२३४ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात होते. दरम्यान, धोम धरण ७६.३१ टक्के भरले आहे तर कण्हेर ७८.२६ टक्के, कोयना ८५.६७ टक्के आणि उरमोडी धरणात ७४.४६ टक्के पाणीसाठा झाला होता. इतर धरणांमधील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे.

.................................................................