शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

दडी मारलेल्या पावसाची साता-यात रिमझिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:40 PM

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सातारा शहर व परिसरात शनिवारी सायंकाळपासून रिमझिम सुरूवात केली आहे. तर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अद्यापही पावसाला जोर नाही.

 सातारा - गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सातारा शहर व परिसरात शनिवारी सायंकाळपासून रिमझिम सुरूवात केली आहे. तर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अद्यापही पावसाला जोर नाही. त्यामुळे धरणात आवक नाही. दुसरीकडे कोयनानगर येथे २४ तासांत अवघा १५ मिलीमिटर पाऊस झाला असून दुष्काळी भागात पुरेशा पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. 

यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत झाले. सुरुवातीला साता-यासह पूर्व दुष्काळी भागातही अनेक ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांसह सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पावसाने सुरूवात चांगली केल्याने पेरण्या होतील, असा विश्वास निर्माण झाला होता. पण, गेल्या सहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पश्चिम भागातील झडी वगळता कोठेही पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकºयांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. असे असतानाच शनिवारी सायंकाळपासून सातारा शहरासह परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. रविवारी दुपारी बारानंतरही ही रिमझिम सुरू होती. त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाहीच. 

तसेच कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी या धरणक्षेत्रात पावसाचा जोर अद्यापही नाही. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झालेली नाही. दुसरीकडे दुष्काळी तालुक्यात पावसाची दडी शेतक-यांना चिंताग्रस्त करत आहे. कारण, सुरूवातीला पाऊस झाला. त्यानंतर अनेक गावांत पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. पाऊस वेळेत पडेल व पेरणी होईल, या आशेवर शेतकरी आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाल्यास पेरणी होणार आहे. पावसाने ओढ दिली तर पेरणी रखडणार आहे. 

 धरणक्षेत्रातील २४ तासांतील व आतापर्यंतचा एकूण पाऊस 

धोम    ०२      (४७)     कोयना   १५   (२७६) कण्हेर  ००      (२८)     बलकवडी ०७  (१२८) तारळी  ००     (५३)     उरमोडी   ०३    (३३)  

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर