शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

गावचे राजकारण पिकाच्या मुळावर

By admin | Updated: July 15, 2015 00:22 IST

अभेपुरीत खुन्नस : विद्युत मोटारगृहातील साहित्यांची तोडफोड

वाई : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण तापायला लागलेले असतानाच वाई तालुक्यातील अभेपुरी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तीने राजकीय खुन्नशीतून दहा शेतकऱ्यांच्या शेतातील भाताच्या तरव्यावर तणनाशकाची फवारणी केली आहे. तसेच शेतीपाणी योजनेच्या वीजगृहातील साहित्य तोडून हजारो रुपयांचे नुकसान केले आहे. याबाबत माहिती अशी की, अभेपुरी येथील शेतकरी कऱ्हाड, कर्जत येथून नवनवीन जातीचे बियाणे आणतात. यंदाही शेतकऱ्यांनी बासमती ३७०, इंद्रायणी इंडम यासारख्या भाताच्या बियाण्यांच्या रोपांचे तरवे केले होते. गावात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अशातच रविवारी लिंगवात व वाडा या दोन शिवारातील शेतकऱ्यांच्या भाताच्या रोपाच्या तरव्यावर अज्ञातानी तणनाशकाची फवारणी केली. याचा परिणाम दोन-तीन दिवसांनंतर दिसायला लागला आहे. रोपे जळायला लागली आहेत, त्यानंतर कोणीतरी तणनाशक फवारल्याचे लक्षात आले. तसेच काही शेतपाणी योजनेच्या वीजगृहातील साहित्यांचे नुकसान केले आहे. यामध्ये झुंजार मांढरे यांचे ७५ किलो, विजय मांढरे यांचे २० किलो, महादेव मांढरे यांचे ६० किलो, भानुदास मांढरे यांचे १० किलो, अशोक मांढरे यांचे २० किलो, सोमनाथ मांढरे यांचे १० किलो, दिपक पवार यांचे २५ किलो असे सुमारे २२५ किलो बियाणे जळाले. यामध्ये दहा ते पंधरा एकर शेतात भाताची लागण झाली असती. (प्रतिनिधी)तीन दिवसांपूर्वी शिवारात भाताच्या रोपाच्या शेतावर गेलो असता तरवा पिवळा व वाळून जाऊ लागल्यासारखा दिसू लागला. म्हणून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखविला असता त्यावर तणनाशक फवारले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे आमचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.- झुंजार मांढरे, शेतकरी