शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

कऱ्हाडात राजकीय आघाड्या टिकणार?, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 11:16 IST

वैचारिक बैठक वेगवेगळी असेल तर त्यांचे मैत्रीपर्व हे किती दिवस चालते हे सत्तानाट्यावरून स्पष्ट झाले आहेच.

प्रमोद सुकरेकराड : राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. राज्यात राजकारणातून त्याचा अनुभव येत आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर हे सरकार पडण्यामागे अनैसर्गिक पद्धतीने झालेली महाविकास आघाडी हेच कारण दिले जात आहे, पण त्यामुळे आता कराड तालुक्यातील आघाड्या नैसर्गिक की अनैसर्गिक अन् त्याच्या भवितव्याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी केलेली आघाडी त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना पचनी पडली नव्हती हे अडीच वर्षांनी बंडाच्या निमित्ताने समोर आले. वैचारिक बैठक वेगवेगळी असेल तर त्यांचे मैत्रीपर्व हे किती दिवस चालते हे सत्तानाट्यावरून स्पष्ट झाले आहेच. सोयीचे राजकारण आणि आघाड्या स्थानिक पातळीवरही होत राहतात. त्याचे भविष्यात काय होणार? याबाबतच्या चर्चा झाल्या नाहीत तर नवलच !

बाळासाहेब- उदयसिहांचं जिल्हा बँकेवरून बिघडलंदिवंगत विलासराव पाटील व माजी आमदार पी. डी. पाटील या दोघांच्यात सुमारे ४० वर्षेे चांगले राजकीय संबंध राहिले. तीच परंपरा बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील पुढे काही वर्षे चालवत होते. मात्र, विलासराव पाटील यांच्या निधनानंतर जिल्हा बँक निवडणुकीत उदयसिंह पाटील यांनी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. त्याविरोधात बाळासाहेबांनी दंड थोपटले आणि दोन गटात बिघडलं. या निवडणुकीत उदयसिंह पाटलांच्या पाठीशी काँग्रेस किती उभी राहिली? याबाबतही उलटसुलट चर्चा आहेत.

बाळासाहेब पाटील- अतुल भोसले आघाडीबाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले या दोन गटांत जयवंत शुगरच्या उभारणीपासूनच सुप्त संघर्ष सुरू झाला होता. सन २००९ साली डॉ. भोसलेंनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवीत उत्तरेवर स्वारी केली. त्यामुळे आणखी बिघडले, पण नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या बाळासाहेब पाटील यांना भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. भोसले यांनी पाठिंबा देत त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. डॉ. सुरेश भोसलेंनी तर यापुढे प्रत्येक निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना आमची मदतच राहील, असे जाहीर करून टाकले आहे, पण राष्ट्रवादीच्या अविनाश मोहिते व भाजपच्या शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर यांना ही बाब किती रुचली आहे हे कळायला थोडा वेळ जाईल एवढेच!

चव्हाण-उंडाळकर यांचं जुळलं !कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील या दोन गटांत काँग्रेसअंतर्गत संघर्ष सुमारे ३५ वर्षे पाहिला आहे. २ वर्षांपूर्वी विलासराव पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर मेळाव्यातून या संघर्षाला पूर्णविराम देण्यात आला, पण दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांची मने आजही जुळलेली दिसत नाहीत आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांना हे किती पचनी पडले आहे. हे सांगता येत नाही.

कार्यकर्त्यांचा सूर...कराड पालिका निवडणूक पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब पाटील यांच्या गटांनी एकत्रित लढावी; तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक ही बाळासाहेब पाटील व उंडाळकर यांच्या गटाने एकत्रित लढावी; भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढाव्यात अशा भावना इच्छुक उमेदवारांच्या आहेत, पण या भावना नेत्यांपर्यंत पोहोचणार का? पोहोचल्याच तर नेते दखल घेणार का? हे पाहण्यासाठी थोडे थांबावेच लागेल.

महाविकास आघाडी एकत्र लढणार का?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढाव्यात, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे, तर उद्धव ठाकरे यांनीही तीच री ओढलेली आहे. अशा परिस्थितीत कराड तालुक्यातील निवडणुका कशा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा