शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

दोन वर्षांपासून वृक्षारोपण मंदावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST

कोपर्डे हवेली : गत दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याने त्याचा परिणाम वृक्षारोपणावर झाल्याचे दिसत आहे. ...

कोपर्डे हवेली : गत दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याने त्याचा परिणाम वृक्षारोपणावर झाल्याचे दिसत आहे.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनाबरोबर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत असते. पावसाळ्यात हे वृक्षारोपण केले जाते. वेगवेगळ्या जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येत असते.

यामध्ये सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये, कृषी विभाग, ग्रामपंचायत, नगरपालिका आदींसह इतर घटक आघाडीवर असतात. फळझाडे लागवडीसाठी कृषी विभाग अनुदान देतो.

गेल्या वर्षी आणि या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाचे वृक्षारोपणाचे प्रयत्न तोकडे पडत आहे. अपवाद आहे तो फळझाडे लागवडीचा. ते करण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे.

गेल्या काही वर्षांत ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत होते. त्याला कोरोनामुळे दोन वर्षांत मर्यादा आल्या आहेत. शाळा बंद आहेत. तर इतर संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात गुंतल्या आहेत. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून वृक्षारोपणाचा वेग मंदावला आहे.