शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

दोन वर्षांपासून वृक्षारोपण मंदावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST

कोपर्डे हवेली : गत दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याने त्याचा परिणाम वृक्षारोपणावर झाल्याचे दिसत आहे. ...

कोपर्डे हवेली : गत दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याने त्याचा परिणाम वृक्षारोपणावर झाल्याचे दिसत आहे.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनाबरोबर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत असते. पावसाळ्यात हे वृक्षारोपण केले जाते. वेगवेगळ्या जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येत असते.

यामध्ये सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये, कृषी विभाग, ग्रामपंचायत, नगरपालिका आदींसह इतर घटक आघाडीवर असतात. फळझाडे लागवडीसाठी कृषी विभाग अनुदान देतो.

गेल्या वर्षी आणि या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाचे वृक्षारोपणाचे प्रयत्न तोकडे पडत आहे. अपवाद आहे तो फळझाडे लागवडीचा. ते करण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे.

गेल्या काही वर्षांत ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत होते. त्याला कोरोनामुळे दोन वर्षांत मर्यादा आल्या आहेत. शाळा बंद आहेत. तर इतर संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात गुंतल्या आहेत. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून वृक्षारोपणाचा वेग मंदावला आहे.