शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

फलटणची सुरक्षा धोक्याच्या उंबरठ्यावर!

By admin | Updated: April 1, 2015 00:04 IST

पालकांमध्ये चिंता : पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारीवरच

नसीर शिकलगार - फलटण  रस्त्याने एकटी-दुकटी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीना जबरदस्तीने उचलून नेवून त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या घटनामध्ये फलटण शहरात वाढ झाल्याने पालकवर्ग चिंतेत आहे.पोलीसठाण्यांना मुख्याधिकारी नसल्याने प्रभारीवरच पोलीस ठाण्याचा कारभार चालला आहे. शहराचा कायदा, सुव्यवस्था ढासळली गेल्याने व मुलींवरील अत्याचारात वाढ झाल्याने महिलावर्गात भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फलटण शहर असुरक्षतेचे शहर बनु लागले आहे.फलटण तालुक्याला पहिल्यांदा एकच पोलीस ठाणे होते. मात्र, वाढत्या गुन्हेगारीमुळे चार पाच वर्षापूर्वी नव्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. शहर व परिसरासाठी शहर पोलीस ठाणे व ग्रामीण भागासाठी ग्रामीण पोलीस ठाणे झाले. काही महिने गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाली. मात्र, मागील वर्षभरात तालुक्याची विशेषत शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने नेण्याच्या घटनामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होण्याबरोबरच चोऱ्यामाऱ्या, हाणामारी यांच्या घटनामध्येही वाढ होत चालली आहे.हाणामारीच्या व दहशतीच्या घटनामुळे लहान मुले विशेषत: शालेय मुले, सतत भितीच्या दडपणाखाली वावरताना दिसताना शालेय व कॉलेज युवतींच्या छेडछाडीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याने काही पालकांनी मुलींना शाळा, कॉलेजही पाठविणे बंद केले आहे. त्यातच शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षकपद व उपविभागीय पोलीस अधिकारीपद बऱ्याच महिन्यांपासून रिक्त असून प्रभारीवरच कारभार चालला आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम गुन्हेगारी वाढण्यात होवून पोलीस आपले काय करू शकत नाहीत, अशी समज गुन्हेगारांमध्ये झाली आहे. त्यामुळे रस्त्याने एकटी जाणाऱ्या मुलीला जबरदस्तीने उचलून न्यायचे व अत्याचार करायचा या प्रकारात वाढ झालेली आहे. पंधरा दिवसात दोन घटना घडल्याने मुली व महिलांना रस्त्याने फिरणे मुश्किल होवू लागले आहे.पालकमंत्र्याच्या आश्वासनाचे काय?महिन्यापूर्वी फलटणच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यासमोर स्थानिक पत्रकारांनी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची रिक्तपदे, छेडछाडीच्या वाढलेल्या घटनाबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी दोनच दिवसात गृहमंत्र्यांशी चर्चा करून रिक्तपदे भरण्याची व कायदा सुव्यवस्था सुधारविण्याची ग्वाही दिली होती. मात्र, त्यावर महिना झाला तरी काहीच झाले नाही. उलट सामुदायिक अत्याचाराच्या घटना वाढल्या.फलटणमध्ये आज महिला मुलींना सुरक्षित बाहेर पडणे अवघड होत चालले आहे. पोलीस अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. चेन स्नॅचिंगचे प्रकार वारंवार घडत असून पोलीस तक्रारीची दखल घेत नाही. विनयभंग, अत्याचार यासारख्या घटनामुळे रात्रीचे बाहेर पडणे बंद होत चालले आहे. वारंवार बंदचे प्रकार फलटण शहरात घटत असल्याने व्यापारीवर्ग असुरक्षित आहे. फलटण महिलांसाठी सुरक्षीत राहिलेले नाही.-अ‍ॅड. मयुरी शहा