शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीत २५० ज्येष्ठांना दिली संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:18 IST

सातारा : सातारा जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून सर्वत्र परिचित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दिवंगत यशवंतराव ...

सातारा : सातारा जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून सर्वत्र परिचित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्याने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत यशवंत विचार जोपासणाऱ्या २५० ज्येष्ठ नागरिकांना ग्रामपंचायतीमध्ये सदस्य होण्याची संधी दिली आहे.

यंदाच्या निवडणुकीत तरुण व महिलांची संख्या जितकी लक्षणीय आहे, तितकीच ज्येष्ठांची संख्याही मोठी आहे. गावामध्ये रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा नसताना जे सरपंच होते, त्यांच्या कामाची पोहोच म्हणून अशा लोकांना अनेक गावांनी बिनविरोध निवडून दिले आहे. तसेच आरक्षण सोडत झाल्यानंतर त्यांना सरपंच करण्याचे उद्दिष्टही काही गावांनी ठेवलेले आहे.

नव्या-जुन्यांना सोबत घेऊन गाव विकासाची कास धरल्याचे पाहायला मिळत आहे. शाश्वत विकास करण्यासाठी तरुण पिढी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत आहेत. केवळ विकासाच्या नावाखाली गावे भकास करायची नाहीत. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करायच्या आणि शेतीला असलेला जोडव्यवसाय करुन पुढे चालायचे, असेच प्रत्येकाने ठरवलेले आहे.

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती ८७८

निवडून आलेले सदस्य ७,२६६

विजयी ज्येष्ठ नागरिक २५०

चौकट...

ज्येष्ठ नागरिकांसाठी भवन

ज्येष्ठांना राजकारणाचा अनुभव असतो, त्यासोबतच विकासाची दृष्टीदेखील असते. सर्वांचा विचार करुन ते निर्णय घेतात. आता बहुतांश गावांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी भवने उभी राहिलेली पाहायला मिळतील.

कोट...

मी गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून येत आहे. ५ वर्षे मी सरपंचदेखील होतो. या कालावधीत केलेल्या कामाची पोहोच म्हणून जनता उतारवयातही मला निवडून देत आहे.

- यशवंत महामुलकर, महामुलकरवाडी, ता. जावली

कोट...

गावात वीज पोहोचली नव्हती, तेव्हा आम्ही कंदिलात अभ्यास केला. चार बुके शिकलो, त्याचा गावासाठी फायदा करुन दिला. गावात वीज आणली, आमच्यापरिने पक्के रस्ते तयार केले. पाण्याची टाकी बांधली हीच कामे शाश्वत ठरली आहेत.

- संजय पवार, यवतेश्वर, ता. सातारा

कोट..

गणेश मंडळ, नेहरु युवा मंडळाच्या माध्यमातून कामे केली. डेअरी व्यवसाय असल्याने लोकांशी संपर्क आहे. मंदिराचा जीर्णाेध्दार करण्याच्या कामासाठी प्रयत्न केले. पाणीपुरवठा, क्रीडांगण, तालीम, ग्रंथालय याची कामे करणार आहे. निवडणूक झाली आहे. आता राजकारण खेळत बसण्यापेक्षा गावचा विकास कसा होईल, याचाच विचार निवडून आलेल्या सदस्यांनी करावा.

- हणमंत कणसे, अंगापूर वंदन, ता. सातारा

फोटो नेम : 22संजय पवार, २२ यशवंत महामुलकर, 22हणमंत कणसे

18 विनर्स सिटीजनस इन ग्रामपंचायत