शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर मात करण्यासाठी अन्य शासकीय विभागांची मदत घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:37 IST

कोरेगाव : केवळ कोरेगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आरोग्य, महसूल आणि ग्राम ...

कोरेगाव : केवळ कोरेगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आरोग्य, महसूल आणि ग्राम विकास विभाग हे एकत्रितरीत्या गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी दोन हात करत आहेत. मात्र, अन्य प्रशासकीय विभाग आपल्या कार्यालयीन कामकाजामध्ये मश्गुल असल्याचे चित्र कोरेगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.

सामाजिक वनीकरण, वन विभाग, सहकार विभाग, जलसंपदा विभाग, पशुसंवर्धन, कृषी विभाग कार्यरत आहेत. कोरेगाव हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने येथे वरिष्ठ अधिकारी हे खातेप्रमुख म्हणून काम पाहतात. ज्याप्रमाणे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रशासकीय विभागातील अधिकाऱ्यांना झोनल ऑफिसर म्हणून नेमणूक दिली जाते, त्यांच्याकडे विभागवार नेमणुका दिल्या जातात, अगदी त्याच धर्तीवर कोरोनाशी दोन हात करताना या विभागांना बरोबर घेणे आवश्यक आहे.

केवळ पश्चिम महाराष्ट्रातच या अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कोरोनाच्या लढाईत बरोबर घेण्यात आलेले नाही. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये अन्य खातेप्रमुख आरोग्य, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. एकंदरीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सद्य:स्थितीत काम करत असलेल्या अधिकाऱ्यांवर येणारा ताणतणाव आदी परिस्थिती जाणून घेऊन अन्य विभागातील अधिकाऱ्यांना आता नेमणुका देणे गरजेचे आहे. लॉकडाऊन आणि कडक निर्बंध याचे पालन केवळ पोलीस दलाला रस्त्यावर उतरून करावे लागत आहे. त्यांच्या जोडीला जर आरटीओ, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग आदी गणवेशधारी विभाग जर बरोबर घेतले तर शासनाने घेतलेल्या निर्णयांची कडक अंमलबजावणी होईल. त्याचप्रमाणे वरिष्ठ कार्यालय आणि अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यासाठी डाटा एन्ट्रीचे कार्यालयीन कामकाज हे शिक्षण विभाग, नामांकित शिक्षण संस्थांमध्ये काम करत असलेली क्लार्क व अधीक्षक आदींना या प्रवाहात आणता येणे शक्य आहे. शासन या विभागातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दरमहा पगार अदा करत आहे, त्यामुळे अन्य काही वेतन अथवा भत्ता, मानधन देणे शासनावर बंधनकारक राहणार नाही. त्यामुळे कामकाजात ताण कमी होऊन कोरोनाशी लढाई लढणे सोपे होणार आहे.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा करून योग्य ते दिशा निर्देश दिल्यास जिल्ह्यातून कोरोना निश्चितपणे हद्दपार होईल.