शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

Satara: ‘कृष्णा’च्या पाण्यात जलपर्णीचा ‘कालवा’, कॅनॉलला विळखा 

By संजय पाटील | Updated: May 19, 2025 16:21 IST

काटेरी झुडपे, गवताचे साम्राज्य; सातारा, सांगलीत लाभक्षेत्र असूनही दुर्लक्ष, पाणी पोहोचेपर्यंत संपते आवर्तन

संजय पाटीलकऱ्हाड : साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीक्षेत्राची तहान भागविणाऱ्या कृष्णा कालव्यात सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. मात्र, कऱ्हाडपासूनच या कालव्याला जलपर्णीने वेढले असून ठिकठिकाणी मोठी पडझड झाल्याने प्रवाहात अडथळे निर्माण होत आहेत. जलपर्णी, काटेरी झुडपे, दगडांचा खच आणि दगड-मातीच्या ढिगाऱ्यामुळे कालव्याचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र आहे.

कऱ्हाड तालुक्यात कृष्णा नदीवर असलेल्या खोडशी बंधाऱ्यातून कृष्णा कालवा सुरू होतो. तेथून सैदापूरसह कऱ्हाड तालुक्यातील अन्य गावे व पुढे सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतून हा कालवा जातो. मात्र, सैदापूर येथे नागरी वस्त्यांचे सांडपाणी थेट कालव्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. तसेच अन्यही कारणांमुळे कालव्याची मोठी वाताहत झाली आहे. जलपर्णी, गवत, झुडपे कालव्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर उगवली आहेत. त्यामुळे संपूर्ण कालवा झाकोळला गेला आहे. काही ठिकाणी तर इथून कालवा वाहतो, यावर विश्वासच बसणार नाही एवढी भयावह स्थिती आहे. जलपर्णीने पाण्याचे पात्रच दिसेनासे झाले आहे.

देखभालीकडे होतेय दुर्लक्षजलपर्णीने व्यापलेल्या कालव्याचे अस्तित्वच सध्या धोक्यात आले आहे. एवढी कालव्याची दयनीय अवस्था आहे. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करणाऱ्या पाटबंधारे विभागाचे कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

पाणी पोहोचेपर्यंत संपते आवर्तन

  • अडथळे निर्माण झाल्यामुळे पाणी गतीने पुढील गावांपर्यंत पोहोचत नाही.
  • वेळेत पाणी न पोहोचल्याने शेतकऱ्यांना शेतीलाही पुरेसे पाणी देता येत नाही.
  • कालव्याला सोडलेले पाणी शेवटच्या गावात पोहोचेपर्यंत आवर्तन संपते.
  • कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

अनेक वर्षे दुरुस्तीचे काम रखडलेकृष्णा कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वर्षानुवर्षे कॅनॉल दुरुस्तीचे कामच झालेले नाही. ठिकठिकाणी कॅनॉल खचला आहे. झाडे, झुडपे, जलपर्णी, गवत वाढले आहे. सायपन पुलाशेजारी प्लास्टिक बाटल्या व कचरा साचून राहिला आहे.

लेखाजोखा

  • १८६८ : साली कालव्याचे काम पूर्ण
  • १८६८ : मधील रब्बी हंगामात पहिल्यांदा सोडले पाणी
  • ८६ : किलोमीटर कालव्याची लांबी
  • १३,३६६ : हेक्टर सिंचनाखालील क्षेत्र
  • ४५ : गावांना होतो पाण्याचा लाभ

सातारा, सांगलीच्या चार तालुक्यांत लाभक्षेत्रकऱ्हाड तालुक्यातील खोडशी येथे कृष्णा नदीच्या डाव्या तिरावरून कालव्यास प्रारंभ होतो. कऱ्हाड तालुक्यातील सैदापूर, गोवारे, टेंभू, कोरेगाव, कार्वे, वडगाव हवेली, शेणोली यासह सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, तासगाव तालुक्यातून हा कालवा जातो. चार तालुक्यांत कालव्याचे लाभक्षेत्र आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडWaterपाणीriverनदीpollutionप्रदूषण