शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ‘कृष्णा’च्या पाण्यात जलपर्णीचा ‘कालवा’, कॅनॉलला विळखा 

By संजय पाटील | Updated: May 19, 2025 16:21 IST

काटेरी झुडपे, गवताचे साम्राज्य; सातारा, सांगलीत लाभक्षेत्र असूनही दुर्लक्ष, पाणी पोहोचेपर्यंत संपते आवर्तन

संजय पाटीलकऱ्हाड : साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीक्षेत्राची तहान भागविणाऱ्या कृष्णा कालव्यात सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. मात्र, कऱ्हाडपासूनच या कालव्याला जलपर्णीने वेढले असून ठिकठिकाणी मोठी पडझड झाल्याने प्रवाहात अडथळे निर्माण होत आहेत. जलपर्णी, काटेरी झुडपे, दगडांचा खच आणि दगड-मातीच्या ढिगाऱ्यामुळे कालव्याचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र आहे.

कऱ्हाड तालुक्यात कृष्णा नदीवर असलेल्या खोडशी बंधाऱ्यातून कृष्णा कालवा सुरू होतो. तेथून सैदापूरसह कऱ्हाड तालुक्यातील अन्य गावे व पुढे सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतून हा कालवा जातो. मात्र, सैदापूर येथे नागरी वस्त्यांचे सांडपाणी थेट कालव्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. तसेच अन्यही कारणांमुळे कालव्याची मोठी वाताहत झाली आहे. जलपर्णी, गवत, झुडपे कालव्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर उगवली आहेत. त्यामुळे संपूर्ण कालवा झाकोळला गेला आहे. काही ठिकाणी तर इथून कालवा वाहतो, यावर विश्वासच बसणार नाही एवढी भयावह स्थिती आहे. जलपर्णीने पाण्याचे पात्रच दिसेनासे झाले आहे.

देखभालीकडे होतेय दुर्लक्षजलपर्णीने व्यापलेल्या कालव्याचे अस्तित्वच सध्या धोक्यात आले आहे. एवढी कालव्याची दयनीय अवस्था आहे. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करणाऱ्या पाटबंधारे विभागाचे कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

पाणी पोहोचेपर्यंत संपते आवर्तन

  • अडथळे निर्माण झाल्यामुळे पाणी गतीने पुढील गावांपर्यंत पोहोचत नाही.
  • वेळेत पाणी न पोहोचल्याने शेतकऱ्यांना शेतीलाही पुरेसे पाणी देता येत नाही.
  • कालव्याला सोडलेले पाणी शेवटच्या गावात पोहोचेपर्यंत आवर्तन संपते.
  • कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

अनेक वर्षे दुरुस्तीचे काम रखडलेकृष्णा कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वर्षानुवर्षे कॅनॉल दुरुस्तीचे कामच झालेले नाही. ठिकठिकाणी कॅनॉल खचला आहे. झाडे, झुडपे, जलपर्णी, गवत वाढले आहे. सायपन पुलाशेजारी प्लास्टिक बाटल्या व कचरा साचून राहिला आहे.

लेखाजोखा

  • १८६८ : साली कालव्याचे काम पूर्ण
  • १८६८ : मधील रब्बी हंगामात पहिल्यांदा सोडले पाणी
  • ८६ : किलोमीटर कालव्याची लांबी
  • १३,३६६ : हेक्टर सिंचनाखालील क्षेत्र
  • ४५ : गावांना होतो पाण्याचा लाभ

सातारा, सांगलीच्या चार तालुक्यांत लाभक्षेत्रकऱ्हाड तालुक्यातील खोडशी येथे कृष्णा नदीच्या डाव्या तिरावरून कालव्यास प्रारंभ होतो. कऱ्हाड तालुक्यातील सैदापूर, गोवारे, टेंभू, कोरेगाव, कार्वे, वडगाव हवेली, शेणोली यासह सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, तासगाव तालुक्यातून हा कालवा जातो. चार तालुक्यांत कालव्याचे लाभक्षेत्र आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडWaterपाणीriverनदीpollutionप्रदूषण