शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST

सातारा : राज्याच्या विधानसभेत ज्या पध्दतीने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे सरकार तयार झाले, त्याच धर्तीवर सातारा ...

सातारा : राज्याच्या विधानसभेत ज्या पध्दतीने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे सरकार तयार झाले, त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातदेखील या तिन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला बाजूला ठेवण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकांत आघाडी कायम ठेवलेली आहे. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये त्यांना यश आले नसले, तरी काही ग्रामपंचायतींमध्ये ही आघाडी झालेली आहे.

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यातील १२३ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आले, तर ९८ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. ६५४ ग्रामपंचायतींची निवडणूक लागलेली आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये यशस्वी करण्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना यश आले. त्या धर्तीवर ग्रामपंचायत निवडणुकीमध्येदेखील आघाडी करून भाजपला रोखण्याचा प्रयोग या पक्षांनी केला आहे. काही ठिकाणी त्यांना यश आले; मात्र काही ठिकाणी राष्ट्रवादी वगळता इतर पक्षांची ताकदच कमी पडत असल्याने राष्ट्रवादीनेच खिंड लढवायला घेतल्याचे चित्र आहे.

विशेषत: वाई, कऱ्हाड, जावळी, सातारा, माण, खटाव या तालुक्यांमध्ये भाजप हा तिन्ही पक्षांचा प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. या तालुक्यांतील मूळचे काँग्रेस अथवा राष्ट्रवादीत असणारे नेते भाजपमध्ये गेले असल्याने राष्ट्रवादीने काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुकीचे डावपेच आखले आहेत. आता निवडणुकीनंतरच खरे चित्र पुढे येईल. सध्या तरी निवडणुकीचा प्रचार त्वेषाने सुरू आहे.

निकालानंतर महाआघाडीचा खराखुरा चेहरा समोर येणार

n राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी जिल्ह्यातील काही गावांत एकत्र येण्यासाठी आवाहन केले. काही गावांत त्याला यशही आल्याचे पाहायला मिळते.

n राष्ट्रवादीवर नाराज असलेले जिल्ह्यातील स्थानिक नेते भाजपच्या कळपात गेले असल्याने अनेक ठिकाणी संघर्ष पेटला आहे. अशा गावांत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी युती करण्याबाबत स्थानिक नेत्यांना आवाहन करण्यात आले हाेते. काही ठिकाणी यश आले. पुसेगाव या मोठ्या ग्रामपंचायतीत भाजपला रोखण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढत आहेत.

- डॉ. सुरेश जाधव,

जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

शिवसेनेची जिथे ताकद आहे, अशा ठिकाणी स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. मात्र भाजपला बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत आघाडी केलेली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेचे सदस्य बिनविरोध निवडले आहेत. आगामी काळातदेखील तिन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढतील.

- चंद्रकांत जाधव,

जिल्हाध्यक्ष, शिवसेना

राज्याच्या विधानसभेत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्थानिक गट-तट असतात. एकाच पक्षाचे दोन गट एकमेकांपुढे उभे राहतात. यंदाही तसे झाले असल्याचे दिसते.

- सुनील माने,

जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

त्वेषाने लढून नंतर आघाडी

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आमदार विशेषत: लक्ष घालत नाहीत. मात्र ज्या ठिकाणी आपला गट कमकुवत होतोय, असे वाटल्यास आमदार स्वत: मैदानात उतरतात. मात्र, आपलेच कार्यकर्ते जर एकमेकांच्या विरोधात असतील, तर मात्र आमदार लक्ष घालत नाहीत. निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या राजकारणात विशेष लक्ष दिले जाते. विरोधकांचे कमकुवत दुवे ओळखून आघाड्या होतात.